शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

महामार्ग की ‘मृत्यूमार्ग’

By admin | Updated: July 13, 2015 02:26 IST

प्रादेशिक महामार्ग पोलिसांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातात मृतांचे प्रमाण काही काळापासून वाढीस लागले आहे.

नागपूर : प्रादेशिक महामार्ग पोलिसांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातात मृतांचे प्रमाण काही काळापासून वाढीस लागले आहे. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर गेल्या अडीच वर्षात विविध प्रकारच्या साडेचार हजारांहून अधिक अपघातांमध्ये २८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर या अपघातांची सरासरी काढली तर दिवसाला पाच अपघातांमध्ये तीन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी महामार्ग पोलिसांच्या नागपूर प्रादेशिक विभागाला माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ मे २०१५ या अडीच वर्षांच्या कालावधीत विभागाच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर झालेले अपघात, मृत झालेल्या व्यक्ती, पोलिसांचे संख्यबळ इत्यादी प्रकारची विचारणा यात करण्यात आली होती. महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाने १५ जून २०१५ पर्यंतची आकडेवारी दिली. या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग ६, ७ व ६९ वर १८७१ अपघात झाले. यात ११४२ नागरिकांचा जीव गेला. याच कालावधीत राज्य महामार्गांवर २८९२ अपघात झाले व यात १७४२ नागरिकांचा बळी गेला. ‘ट्रक’च्या वेगावर हवे नियंत्रणमहामार्गांवर सर्वात जास्त वर्दळ ‘ट्रक’ची दिसून येते. अनेकदा ट्रकचालक नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असतात. यातूनच अनेकदा अपघात झाल्याचे दिसून येते. या अडीच वर्षांत ट्रकचे अपघात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४७६३ अपघातांपैकी ९४९ अपघात हे चक्क ट्रकने झाले आहेत.