शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

उच्चशिक्षितांनी समाजाला दूर लोटले : सुचित बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. याच आरक्षणामुळे बहुजन वर्गातील लोकांची प्रगती झाली. उच्चशिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर नोकऱ्या मिळविल्या. मात्र, समाजाप्रति असलेली जबाबदारी ते विसरले. केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडविण्यात त्यांचे योगदान दिसत नाही, असे मत आंबेडकरी विचारवंत डॉ. सुचित बागडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभारत मुक्ती मोर्चातर्फे प्रबोधन संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. याच आरक्षणामुळे बहुजन वर्गातील लोकांची प्रगती झाली. उच्चशिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर नोकऱ्या मिळविल्या. मात्र, समाजाप्रति असलेली जबाबदारी ते विसरले. केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडविण्यात त्यांचे योगदान दिसत नाही, असे मत आंबेडकरी विचारवंत डॉ. सुचित बागडे यांनी व्यक्त केले.भारत मुक्ती मोर्चातर्फे आयोजित जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया, मुझे निष्ठावान लोगों की आवश्यकता है’, असा या प्रबोधन संमेलनाचा विषय होता. माहेश्वरी सांस्कृतिक भवन, सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष डॉ. विवेक घाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, बहुजन विचारवंत अरविंद माळी, डॉ. विमल कीर्ती उपस्थित होते.डॉ. बागडे पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी १६ विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविले होते. शिक्षण पूर्ण करून ते मायदेशी परतल्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे वगळता एकानेही समाजाप्रति आपली जबाबदारी पार पाडली नाही. या शिक्षित लोकांनी आपले कुटुंब सांभाळून समाजालाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही. ही घटना बाबासाहेबांसाठी वेदनादायी ठरली. त्यामुळे १८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथील एका बुद्ध विहाराच्या उद्घाटनाला बाबासाहेब गेले असता, मार्गदर्शन करताना ‘मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया’, असे मत मांडल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले. हे वाक्य विदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी होते. मात्र, आजही समाजाची स्थिती फारशी बदलली नाही. बाबासाहेबांचे वाक्य उच्च शिक्षितांसाठी आजही लागू होते. कारण बहुजन वर्ग शिक्षणात बराच पुढे गेला आहे. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात क्रांती घडली. तशीच क्रांती त्यांनी समाजात घडवायला पाहिजे होती. मात्र, त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाकडेच लक्ष दिले. त्यामुळे आजही समाजातील घटक त्याच स्थितीत आहे, असा घणाघाती अरोपही डॉ. बागडे यांनी केला.शिक्षित वर्गाने कुटुंबासह आपल्या मिळकतीचा काही भाग समाजासाठी खर्च करावा. समाजाला योग्य दिशा द्यावी. मात्र, असे होताना दिसत नाही. परिणामी तरुण वर्ग दिशाहीन होत चालला आहे. देशात कुठेही समाजावर अन्याय झाला की, बहुजन वर्ग पेटून उठतो. अशावेळी शिक्षित, साहित्यिक आणि पुढाऱ्यांची गरज वाटते. त्रस्त झालेला तरुण वर्ग वेळप्रसंगी कुठल्याही नेत्याची वाट न पाहता स्वत:च आंदोलन उभारत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी वामन मेश्राम, डॉ. विवेक घाटे, डॉ. विमल कीर्ती, अरविंद माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कमलेश सोरते यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. श्वेता बागडे यांनी तर आभार रवी घोडेस्वार यांनी मानले.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरEducationशिक्षणcommunityसमाज