शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

हायकोर्टाचा इशारा :पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 20:06 IST

शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची नावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारला दिले.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याचा सरकारला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची नावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारला दिले.सामाजिक कार्यकर्ते नितीन तिवारी यांनी ट्रॅव्हल्स कंपन्या, राज्य सरकार व इतरांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. अंजन डे व अ‍ॅड. अपूर्व डे यांनी पोलिसांवरील हल्ल्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने या घटनांची गंभीर दखल घेऊन वरील आदेश दिले. गत मंगळवारी व बुधवारी नरसाळा, मानकापूर व गणेशपेठ या तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते तसेच पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती.न्यायालयाची अवमाननानियमानुसार एसटी बसस्थानकापासून २०० मीटर परिसरामध्ये खासगी प्रवासी वाहने उभी ठेवता येत नाही व प्रवासी वाहतूक करता येत नाही. असे असताना खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशपेठ बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात व प्रवासी वाहतूक करतात. यासंदर्भात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने सरकार व ट्रॅव्हल्स कंपन्यांविरुद्ध कडक आदेश जारी केले होते. परिणामी, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी संयुक्तपणे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:ला नियंत्रित करण्याची व नियमांचे पालन करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती. २२ मार्च २०१८ रोजी न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन याचिका निकाली काढली होती. त्यानंतर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी काही महिनेच नियमांचे पालन केले. आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या मनमानीपणे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी न्यायालयाचा आदेश वेशीला टांगला आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळ ट्रॅव्हल्स उभ्या केल्या व सोडल्या जात आहेत. त्यामुळे तिवारी यांनी न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासून अहवाल द्यापोलीस आयुक्तांनी गणेशपेठ बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सची नावे व क्रमांकासह अहवाल सादर करावा आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. तसेच राज्याच्या गृह विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून, याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांवर येत्या ११ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस