शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हायकोर्टाचा इशारा :पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 20:06 IST

शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची नावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारला दिले.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याचा सरकारला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची नावे न्यायालयात सादर करण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारला दिले.सामाजिक कार्यकर्ते नितीन तिवारी यांनी ट्रॅव्हल्स कंपन्या, राज्य सरकार व इतरांविरुद्ध उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. अंजन डे व अ‍ॅड. अपूर्व डे यांनी पोलिसांवरील हल्ल्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने या घटनांची गंभीर दखल घेऊन वरील आदेश दिले. गत मंगळवारी व बुधवारी नरसाळा, मानकापूर व गणेशपेठ या तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते तसेच पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती.न्यायालयाची अवमाननानियमानुसार एसटी बसस्थानकापासून २०० मीटर परिसरामध्ये खासगी प्रवासी वाहने उभी ठेवता येत नाही व प्रवासी वाहतूक करता येत नाही. असे असताना खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशपेठ बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात व प्रवासी वाहतूक करतात. यासंदर्भात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने सरकार व ट्रॅव्हल्स कंपन्यांविरुद्ध कडक आदेश जारी केले होते. परिणामी, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी संयुक्तपणे प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:ला नियंत्रित करण्याची व नियमांचे पालन करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती. २२ मार्च २०१८ रोजी न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन याचिका निकाली काढली होती. त्यानंतर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी काही महिनेच नियमांचे पालन केले. आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या मनमानीपणे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी न्यायालयाचा आदेश वेशीला टांगला आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळ ट्रॅव्हल्स उभ्या केल्या व सोडल्या जात आहेत. त्यामुळे तिवारी यांनी न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासून अहवाल द्यापोलीस आयुक्तांनी गणेशपेठ बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सची नावे व क्रमांकासह अहवाल सादर करावा आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. तसेच राज्याच्या गृह विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून, याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांवर येत्या ११ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस