शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हायकोर्ट : शिक्षक पात्रता चाचणीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:42 IST

अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना दिलासा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला.या शासन निर्णयाच्या वैधतेला गौरव दातीर यांच्यासह एकूण ३० शिक्षकांनी आव्हान दिले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अल्पसंख्यक शाळांच्या व्यवस्थापनांनी याचिकाकर्त्या शिक्षकांना २०१३ ते २०१५ या कालावधीत नियुक्त केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्त्यांना मान्यता प्रदान केली आहे. असे असताना १३ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या शिक्षकांनाही पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यांना ३० मार्च २०१९ पर्यंत तीन प्रयत्नामध्ये ही चाचणी उत्तीर्ण करण्यास सांगण्यात आले होते आणि चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयश आल्यास बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला होता. परिणामी, याचिकाकर्त्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारचा निर्णय एकतर्फी व अवैध आहे. हा निर्णय अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना लागू केला जाऊ शकत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकार्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक