शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

हायकोर्टाचा दणका : चार आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 10:30 PM

Wardha murder case, Four accused sentenced to life imprisonment in High Court मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये चार आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देवर्धा सत्र न्यायालयाचा निर्णय पलटवला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये चार आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्वाळा दिला. नामदेव हरी दयारे (४२), मालू ज्ञानेश्वर उईके (४६), गिरीश उत्तम गदाडे (४२) व श्याम दादू गोंडाणे (४७) अशी आरोपींची नावे असून ते पुलगाव येथील रहिवासी आहेत. ५ सप्टेंबर २००६ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचून या चारही आरोपींना निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सरकारचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲड. मेहरोज खान पठाण यांनी कामकाज पाहिले.

अशी घडली घटना

मयताचे नाव राजकुमार पायेकर होते. २३ फेब्रुवारी २००५ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपी नामदेव घरापुढे खड्डा करीत होता. इतर आरोपी त्याच्यासोबत होते. दरम्यान, राजकुमारने टोकल्यामुळे नामदेवला राग आला. त्याने राजकुमारच्या डोक्यावर सब्बल मारली. परिणामी, राजकुमार खाली कोसळला. त्यानंतर सर्व आरोपींनी त्याच्यावर पुन्हा सब्बल, काठ्या व गोट्यांनी हल्ला केला. त्यामुळे राजकुमार जागीवरच ठार झाला.

दंडाची रक्कम आईला

आरोपींनी दंड जमा केल्यास, ती संपूर्ण रक्कम मयताची आई शोभा पायेकर यांना देण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, आरोपींनी रक्कम जमा केली की नाही, याचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे पुलगाव पोलीस निरीक्षकांना सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप