शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:36 IST

केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या  विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविविध समस्या दूर : याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या  विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी बायोमेट्रिक्स यंत्रावर त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. यंत्रात ठसे स्वीकारल्या न गेल्यास त्यांचे निवृत्ती वेतन थांबविले जाते. म्हातारपणामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हाताची त्वचा खराब झालेली असते. परिणामी बरेचदा त्यांचे ठसे नामंजूर होतात. अशावेळी काही बँका त्यांचे फिजिकल जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्यासही नकार देतात. परिणामी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. यासंदर्भात आलेल्या विविध तक्रारी व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे केंद्र शासनाने सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. बायोमेट्रिक्स यंत्रावर बोटाचे ठसे स्वीकारल्या जात नसतील तर, कर्मचाऱ्यांचे इरिस (बुबुळ) स्कॅनिंग करण्याचे व दोन्ही बाबी अशक्य झाल्यास कर्मचाऱ्यांचे फिजिकल जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.बरेचदा कर्मचाऱ्यांना आजार, अपंगत्व इत्यादी कारणांमुळे स्वत: बँकेत जाणे शक्य होत नाही. अशावेळी बँकांनी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र मिळवावे. अशा कर्मचाऱ्यांना बँकेत हजर होण्यापासून सूट देण्यात यावी असेही बँकांना सांगण्यात आले आहे. याविषयी उच्च न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र शासनाच्या निर्देशामुळे मूळ समस्या संपल्याने न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी हे प्रकरण निकाली काढले. याप्रकरणात अ‍ॅड. एस. एन. भट्टड न्यायालय मित्र होते. केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर व अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर