शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आर्थिक फसवणूक करणाऱ्या चौघांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:04 IST

चेन मार्के टिंगच्या नावाखाली ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींची स्वत:ला आरोपमुक्त करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली.

ठळक मुद्देआरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेन मार्के टिंगच्या नावाखाली ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींची स्वत:ला आरोपमुक्त करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. तसेच, प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता चारही आरोपींविरुद्ध खटला चालविणे आवश्यक आहे असे निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.आरोपींमध्ये पुणे येथील कृष्णकांत छगनलाल चांडक (४२), मनोज छगनलाल चांडक (४४), दाभा (नागपूर) येथील विवेक विजयकुमार ठाकरे (५०) व योगेश विजयकुमार ठाकरे (४७) यांचा समावेश आहे. कृष्णकांत व मनोज हे वादग्रस्त केयर टेक मार्केटिंग कंपनीचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीमार्फत किराणा सामान विकण्याची योजना राबवली जात होती. इच्छुक व्यक्तीला ७१ हजार ५६९ रुपये जमा केल्यानंतर योजनेचे सदस्य केले जात होते. त्यानंतर सदस्य व्यक्तीस नागपुरातील तीन किराणा दुकानातून सवलतीच्या दरात किराणा खरेदी करता येत होता. तसेच, त्याला दर महिन्याला १२ हजार रुपये कमिशन व ३१ सदस्यांचा पिरॅमिड पूर्ण केल्यानंतर २५ टक्के रॉयल्टी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.वाडी येथील फिर्यादी अशोक रहाटे हे या योजनेचे सदस्य झाले होते. परंतु, त्यांना केवळ १८ हजार रुपयेच परत मिळाले. कंपनीने आश्वासन पूर्ण केले नाही. परिणामी, त्यांनी २३ नोव्हेंबर २००३ रोजी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६ यासह एमपीआयडी कायदा व आरबीआय कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता कंपनीने तब्बल १५ हजार ५३५ ग्राहकांकडून ४ कोटी ३ लाख ७५ हजार ४६५ रुपये स्वीकारल्याचे व ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात आली नसल्याचे पुढे आले.वरील चार आरोपींनी स्वत:ला आरोपमुक्त करून घेण्यासाठी सुरुवातीला एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २१ एप्रिल २०१८ रोजी सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता आरोपींचा अर्ज खारीज करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय