शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमविरुद्धच्या कार्यक्रमाला हायकोर्टाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 20:35 IST

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देरविवारी संविधान चौकात होणार कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. त्यामुळे आयोजकांना दिलासा मिळाला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.फोरमचे कार्यकर्ते सुनील जवादे यांनी ३ सप्टेंबर रोजी सीताबर्डी पोलिसांना अर्ज सादर करून, या कार्यक्रमाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्याच दिवशी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नागपूरला येणार असल्यामुळे, ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत असे कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे कारण वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले होते. त्याविरुद्ध फोरम व सुनील जवादे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. पंतप्रधान ७ सप्टेंबर रोजी नागपुरात येऊन त्याच दिवशी पुढच्या कार्यक्रमासाठी दुसरीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्याची परवानगी नाकारण्यात काहीच अर्थ नाही. यापूर्वी विविध ठिकाणी शांततेत कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व व्यक्ती कायदा पाळणारे असून, कुणाविरुद्धही गुन्हे दाखल नाहीत. हे दहा दिवसाचे अभियान आहे. त्याची सुरुवात संविधान चौकातून होणार आहे आणि मुंबईतील शिवाजी पार्क येथे समारोप केला जाणार आहे. परिणामी, सीताबर्डी पोलिसांचा वादग्रस्त निर्णय रद्द करून कार्यक्रमाला परवानगी देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

ईव्हीएमविरोधात ‘दीक्षाभूमी ते चैत्यभूमी’ महाअभियान              महाराष्ट्राच्या विधानसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे करण्याच्या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्यावतीने दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान महाअभियान राबविण्यात येणार आहे. येत्या रविवारी दीक्षाभूमी येथून हे अभियान सुरू होणार असून, मुंबईपर्यंत रथयात्रा व मार्गातील प्रत्येक शहरात पदयात्रा काढून जनतेमध्ये बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यात येणार आहे. ८ सप्टेंबर रोजी या महाअभियानाची सुरुवात दुपारी २ वाजता संविधान चौक येथून करण्यात येणार आहे. नागपूरनंतर वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणेनंतर मुंबई येथे महाअभियानाचा समारोप होईल. या प्रत्येक शहरात आणि गावात ईव्हीएमविरोधात जनजागृती सभा, आंदोलन करण्यात येणार आहे. या महाअभियानासाठी झालेल्या बैठकीत संयोजक अ‍ॅड. स्मिता कांबळे, प्रशांत पवार, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, रोशन बहेरे, कुणाल टेंभुरकर, नीलेश बागडे, प्रफुल्ल मेश्राम, घनश्याम फुसे, क्षितिज रामटेके, प्रांजल बागडे, गुड्डू गोसावी, प्रीतम बुलकुंडे, विश्वास पाटील, सुनील जवादे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी व इतर पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEVM Machineएव्हीएम मशीन