शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ईव्हीएमविरुद्धच्या कार्यक्रमाला हायकोर्टाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 20:35 IST

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देरविवारी संविधान चौकात होणार कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. त्यामुळे आयोजकांना दिलासा मिळाला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.फोरमचे कार्यकर्ते सुनील जवादे यांनी ३ सप्टेंबर रोजी सीताबर्डी पोलिसांना अर्ज सादर करून, या कार्यक्रमाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्याच दिवशी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नागपूरला येणार असल्यामुळे, ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत असे कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे कारण वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले होते. त्याविरुद्ध फोरम व सुनील जवादे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. पंतप्रधान ७ सप्टेंबर रोजी नागपुरात येऊन त्याच दिवशी पुढच्या कार्यक्रमासाठी दुसरीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्याची परवानगी नाकारण्यात काहीच अर्थ नाही. यापूर्वी विविध ठिकाणी शांततेत कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व व्यक्ती कायदा पाळणारे असून, कुणाविरुद्धही गुन्हे दाखल नाहीत. हे दहा दिवसाचे अभियान आहे. त्याची सुरुवात संविधान चौकातून होणार आहे आणि मुंबईतील शिवाजी पार्क येथे समारोप केला जाणार आहे. परिणामी, सीताबर्डी पोलिसांचा वादग्रस्त निर्णय रद्द करून कार्यक्रमाला परवानगी देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

ईव्हीएमविरोधात ‘दीक्षाभूमी ते चैत्यभूमी’ महाअभियान              महाराष्ट्राच्या विधानसभेसह येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे करण्याच्या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्यावतीने दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान महाअभियान राबविण्यात येणार आहे. येत्या रविवारी दीक्षाभूमी येथून हे अभियान सुरू होणार असून, मुंबईपर्यंत रथयात्रा व मार्गातील प्रत्येक शहरात पदयात्रा काढून जनतेमध्ये बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यात येणार आहे. ८ सप्टेंबर रोजी या महाअभियानाची सुरुवात दुपारी २ वाजता संविधान चौक येथून करण्यात येणार आहे. नागपूरनंतर वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणेनंतर मुंबई येथे महाअभियानाचा समारोप होईल. या प्रत्येक शहरात आणि गावात ईव्हीएमविरोधात जनजागृती सभा, आंदोलन करण्यात येणार आहे. या महाअभियानासाठी झालेल्या बैठकीत संयोजक अ‍ॅड. स्मिता कांबळे, प्रशांत पवार, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, रोशन बहेरे, कुणाल टेंभुरकर, नीलेश बागडे, प्रफुल्ल मेश्राम, घनश्याम फुसे, क्षितिज रामटेके, प्रांजल बागडे, गुड्डू गोसावी, प्रीतम बुलकुंडे, विश्वास पाटील, सुनील जवादे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी व इतर पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEVM Machineएव्हीएम मशीन