शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यावर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:22 IST

Nagpur : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पॉवर स्टेशनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पॉवर स्टेशनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून दिलासा मिळाला. या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या मागणीवर दोन महिन्यांत निर्णय घ्या, असा आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शेतामधील पिके नष्ट होणे, जमिनीचा दर्जा खालावणे इत्यादीकरिता ४ हजार ४४४ रुपये प्रतिचौरस मीटरनुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे न्यायालयाने शेतकऱ्यांनी याविषयी आवश्यक पुराव्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज सादर करावा व हा अर्ज मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा, असे सांगितले.

तत्पूर्वी याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी धारीवाल कंपनीच्या बेजबाबदार वृत्तीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. या कंपनीला जलसंसाधन विभागाने ६०० मेगावॅट क्षमतेच्या पॉवर स्टेशनसाठी वर्धा नदीमधील पाणी वापरण्यास तर, जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी शिवधुऱ्यावरून पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली होती. परंतु, कंपनीने शिवधुन्ऱ्यासह शेतातूनही सुमारे २० किलोमीटर लांब पाइपलाइन टाकली. त्या पाइपलाइनची नियमित देखभाल केली जात नाही. त्यामुळे पाइपलाइन अनेकदा फुटते. त्यामुळे शेतपिकांचे व जमिनीच्या दर्जाचे नुकसान होते, अशी माहिती अॅड. गिरटकर यांनी दिली.

कंपनीने केले ५० लाख जमाधारीवाल कंपनीने स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ५० लाख रुपये जमा केले आहेत. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता या रकमेची तीन महिने कालावधीसाठी मुदत ठेव करावी आणि मुदत ठेव परिपक्वतेनंतर मिळणाऱ्या रकमेतून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी, असे निर्देश दिले. तसेच, वाचलेली रक्कम कंपनीला परत करण्यास सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर