शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जेएमएफसी, सरकारी वकील, तपास अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:09 IST

अमरावती जिल्ह्यातील एका मुलीचा जीव घेणाºया वाहन अपघाताच्या प्रकरणामध्ये कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्याचे आढळून आल्यामुळे हा खटला चालविणारे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, सरकारी वकील व तपास अधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर कडक शब्दांत ताशेरे ओढून संबंधित खटल्यावरील वादग्रस्त निर्णय व या निर्णयाची प्रत मुख्य न्यायमूर्तींना अवलोकनासाठी सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच, संबंधित सरकारी वकील व तपास अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देकर्तव्यात कसूर करणे भोवलेअमरावती जिल्ह्यातील अपघात प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती जिल्ह्यातील एका मुलीचा जीव घेणाºया वाहन अपघाताच्या प्रकरणामध्ये कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्याचे आढळून आल्यामुळे हा खटला चालविणारे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, सरकारी वकील व तपास अधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर कडक शब्दांत ताशेरे ओढून संबंधित खटल्यावरील वादग्रस्त निर्णय व या निर्णयाची प्रत मुख्य न्यायमूर्तींना अवलोकनासाठी सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच, संबंधित सरकारी वकील व तपास अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी हा दणका दिला. न्यायालयाने अमरावती पोलीस आयुक्तांना तपास अधिकाऱ्याविरुद्ध तर, अभियोजन संचालकांना सरकारी वकिलाविरुद्ध चौकशी करण्याचा आदेश दिला. चौकशीचा अहवाल चार महिन्यात मागण्यात आला आहे. ६ डिसेंबर २००४ रोजी संबंधित न्याय दंडाधिकाऱ्यांनी प्रकरणातील आरोपीला निर्दोष सोडले होते. उच्च न्यायालयाने तो वादग्रस्त निर्णय रद्द करून हा खटला नव्याने चालविण्याचे व त्यावर सहा महिन्यात निकाल देण्याचे निर्देश दिले. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ही घटना २४ आॅगस्ट २००१ रोजी वलगाव पोलिसांच्या हद्दीत घडली होती. माजीद खान मियाखान पठाण असे आरोपी वाहन चालकाचे नाव आहे. त्याने स्वत:च्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून शोभा काकडे या मुलीला जोरदार धडक दिली. त्यामुळे शोभाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, पण न्यायालयात कुणालाच तपासण्यात आले नाही. तसेच, साक्षीदारांना बजावण्यात आलेला जामीनपात्र वॉरंट तामील झाला किंवा नाही याचा अहवाल रेकॉर्डवर नव्हता. न्याय दंडाधिकाऱ्यांनी प्रकरणातील विविध त्रुटींमुळे सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपीला निर्दोष सोडले होते.काय म्हणाले हायकोर्ट?खटला केवळ आरोपीला निर्दोष सोडण्यासाठी चालविला गेला हे वादग्रस्त निर्णयाचे अवलोकन केल्यानंतर दिसून येते. या प्रकरणामध्ये तपास अधिकारी, सरकारी वकील व न्याय दंडाधिकारी या तिघांनीही आपापल्या कर्तव्यात हयगय केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणे सरकार पक्षाची जबाबदारी आहे, पण तसे होत नसल्यास न्याय दंडाधिकारी हतबल होऊन गप्प राहू शकत नाही. न्यायालयात साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी व पीडित न्यायापासून वंचित राहू नये याकरिता न्याय दंडाधिकाऱ्यांना पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत. न्याय करण्यासोबत न्याय झाला हे दिसणेही महत्त्वाचे आहे असे मत उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात व्यक्त केले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस