शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:01 IST

गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देमहान व्यवसाय असल्याने दावा खर्च बसवला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.डॉ. जैन यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होती. असे असताना त्यांनी केवळ नशीब अजमावण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रयत्नाची कधीच प्रशंसा केली जाऊ शकत नाही. या याचिकेमुळे न्यायालयाचा वेळ व्यर्थ गेला. परंतु, डॉ. जैन हे महान व्यवसायाशी जुळलेले असल्यामुळे त्यांच्यावर दावा खर्च बसवणे टाळत आहोत. त्यांनी यातून धडा घेऊन भविष्यात कायद्याचा उचित सन्मान करावा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर निर्णय दिला.डॉ. जैन यांनी धरमपेठ येथील एका इमारतीच्या तळमाळ्यावर दंत रुग्णालय सुरू केले होते. त्यामुळे त्या जागेचा उपयोग बदलला गेला. परिणामी, महानगरपालिकेने त्यांना १ फेब्रुवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या दंत रुग्णालयाला ९ मार्च २०२० रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे वादग्रस्त नोटीस अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने त्यावर उत्तर सादर करून आरोग्य अधिकाऱ्याला उपयोग बदलाची परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच, डॉ. जैन यांनी संबंधित जागेचा उपयोग बदलण्याची परवानगी मिळविण्यासाठी ९ मार्च रोजी सादर केलेला अर्ज १९ मार्च रोजी फेटाळण्यात आल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने हे मुद्दे लक्षात घेता याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर