शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
3
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
4
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
5
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
6
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
8
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
9
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
10
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
11
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
13
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
14
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
15
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेवर उत्तर सादर करा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 24, 2024 5:25 PM

Nagpur : हायकोर्टाचा सरकारला आदेश; सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी रस्ते, परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव, वन महासंचालक आणि प्रधान मुख्य वन संवर्धक यांना दिले.

या रोडचा तातडीने विकास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र व तेलंगना राज्याला जोडणाऱ्या या रोडची जड वाहतुकीमुळे दूरवस्था झाली आहे. हा रोड जागोेजागी उखरला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, रोडवर अपघात होतात. धुळीमुळे वायू प्रदूषण होते व वाहनेही खराब होत आहेत. हे १०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल १० ते १२ तास लागतात. या रोडमुळे सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वैद्यकीय गरजेच्या वेळी तत्काळ रुग्णालयात पोहोचता येत नाही. अहेरी व भामरागड परिसरातील रोड खूपच खराब झाला आहे. पावसाळ्यात या रोडने जाणे-येणे करणे अशक्य होते. रोडची दुरुस्ती करण्यासाठी जानेवारी-२०२३ मध्ये टेंडर जारी करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. मनोजकुमार मिश्रा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरroad transportरस्ते वाहतूकHigh Courtउच्च न्यायालय