शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

हायकोर्टाची विचारणा : मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यावी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:24 IST

मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देन्यायालय मित्राला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.धोकादायक हायटेंशन लाईन व हायटेंशन लाईनजवळची अवैध बांधकामे यावर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार, मंजूर आराखडा असलेल्या घरांनाच नवीन वीज जोडणी देण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे एसएनडीएल कंपनीने नवीन वीज जोडणीसाठी १७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सादर ६३० अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. या अर्जदारांकडे घराचा मंजूर आराखडा नाही. कंपनीला हे सर्व अर्ज मंजूर करायचे आहेत. त्याची परवानगी मिळावी याकरिता कंपनीने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. भांडारकर यांना यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.असे आहे कंपनीचे म्हणणेवीज जोडणी मिळणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हे अर्जदार हायटेंशन लाईनच्या परिसरात येत नाहीत. त्यामुळे त्यांना वीज जोडणी द्यायला पाहिजे. अर्ज प्रलंबित असल्यामुळे यापैकी काहींनी वीज चोरीचा मार्ग पत्करला आहे. तसेच, काहींनी शेजाऱ्यांकडून वीज जोडणी घेतली आहे. या दोन्ही बाबी अवैध आहे. याशिवाय या अर्जदारांना वीज नसल्यामुळे विविध प्रकारची गैरसोय सहन करावी लागत आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज