शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 18:38 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेतील प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्याकरिता पटोले यांना १५ दिवसाचा वेळ देण्यात आला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

ही निवडणूक याचिका पटोले यांनी दाखल केली आहे. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र कायदेशीर तरतुदींची पूर्तता करीत नाही, प्रतिज्ञापत्रात अनेक त्रुटी आहेत असा दावा करून याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात पटोले यांनी, प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. त्याकरिता संधी मिळणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याच्या तांत्रिक कारणावरून निवडणूक याचिका फेटाळली जाऊ शकत नाही, असे मुद्दे मांडले होते. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता पटोले यांना प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्यामुळे गडकरी यांना धक्का बसला आहे. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर तर, पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली.

२६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी

या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर २६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. गडकरी यांनी निवडणूक याचिकेविरुद्ध दाखल केलेल्या तीन अर्जांवर या तारखेनंतर निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी संबंधित तीन अर्जांद्वारे निवडणूक याचिकेतील निराधार व अवमानजनक मुद्दे वगळण्याचे निर्देश देण्याची, याचिका दाखल करण्यासाठी काहीच ठोस कारण नसल्यामुळे याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची आणि नवीन मुद्दे रेकॉर्डवर आणण्याची परवानगी मिळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

असे आहेत याचिकेतील आरोप

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे पटोले यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेHigh Courtउच्च न्यायालयPoliticsराजकारण