शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 18:38 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेतील प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्याकरिता पटोले यांना १५ दिवसाचा वेळ देण्यात आला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

ही निवडणूक याचिका पटोले यांनी दाखल केली आहे. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र कायदेशीर तरतुदींची पूर्तता करीत नाही, प्रतिज्ञापत्रात अनेक त्रुटी आहेत असा दावा करून याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात पटोले यांनी, प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. त्याकरिता संधी मिळणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याच्या तांत्रिक कारणावरून निवडणूक याचिका फेटाळली जाऊ शकत नाही, असे मुद्दे मांडले होते. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता पटोले यांना प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्यामुळे गडकरी यांना धक्का बसला आहे. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर तर, पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली.

२६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी

या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर २६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. गडकरी यांनी निवडणूक याचिकेविरुद्ध दाखल केलेल्या तीन अर्जांवर या तारखेनंतर निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी संबंधित तीन अर्जांद्वारे निवडणूक याचिकेतील निराधार व अवमानजनक मुद्दे वगळण्याचे निर्देश देण्याची, याचिका दाखल करण्यासाठी काहीच ठोस कारण नसल्यामुळे याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची आणि नवीन मुद्दे रेकॉर्डवर आणण्याची परवानगी मिळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

असे आहेत याचिकेतील आरोप

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे पटोले यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेHigh Courtउच्च न्यायालयPoliticsराजकारण