शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 18:38 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेतील प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्याकरिता पटोले यांना १५ दिवसाचा वेळ देण्यात आला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

ही निवडणूक याचिका पटोले यांनी दाखल केली आहे. दरम्यान, गडकरी यांनी पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र कायदेशीर तरतुदींची पूर्तता करीत नाही, प्रतिज्ञापत्रात अनेक त्रुटी आहेत असा दावा करून याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याच्या प्रत्युत्तरात पटोले यांनी, प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. त्याकरिता संधी मिळणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याच्या तांत्रिक कारणावरून निवडणूक याचिका फेटाळली जाऊ शकत नाही, असे मुद्दे मांडले होते. न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता पटोले यांना प्रतिज्ञापत्रामधील त्रुटी दूर करण्याची संधी दिली. त्यामुळे गडकरी यांना धक्का बसला आहे. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर तर, पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके यांनी बाजू मांडली.

२६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी

या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर २६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. गडकरी यांनी निवडणूक याचिकेविरुद्ध दाखल केलेल्या तीन अर्जांवर या तारखेनंतर निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी संबंधित तीन अर्जांद्वारे निवडणूक याचिकेतील निराधार व अवमानजनक मुद्दे वगळण्याचे निर्देश देण्याची, याचिका दाखल करण्यासाठी काहीच ठोस कारण नसल्यामुळे याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची आणि नवीन मुद्दे रेकॉर्डवर आणण्याची परवानगी मिळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

असे आहेत याचिकेतील आरोप

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे पटोले यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेHigh Courtउच्च न्यायालयPoliticsराजकारण