शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला हेरिटेज कस्तुरचंद पार्कचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:01 IST

कस्तुरचंद पार्क मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीच्या हृदयस्थळी असलेल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाचा गौरव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला आहे. प्रशासनाने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहितीच्या उलट परिस्थिती मैदानावर आहे. मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

या न्यायमूर्तींनी ५ सप्टेंबर रोजी कस्तुरचंद पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, आढळून आलेली दुरवस्था त्यांनी या प्रकरणावरील आदेशात नोंदवून प्रशासनाची कानउघाडणी केली. महान दानशूर जमीनदार सर दिवान बहादूर सेठ कस्तुरचंद डागा यांनी ही जमीन खेळांकरिता दान केली होती. शहराच्या विकास आराखड्यात ही जमीन हिरव्या रंगात दर्शविण्यात आली आहे. तसेच, या मैदानाला ग्रेड-१ हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. असे असताना प्रशासनाने मैदानाचा गौरव जपला नाही. त्यामुळे मैदानाची वाईट अवस्था झाली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.मैदानाची दुरवस्था पाहून न्यायालयाने एप्रिल-२०१७ पासून वेळोवेळी आवश्यक आदेश दिले. परंतु, प्रशासनाने आदेशांची गांभीर्याने अंमलबजावणी केली नाही. विविध विकास कामांमुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. संपूर्ण मैदान ओबडधोबड झाले आहे. मैदानावर व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे खेळाचा विचार करता येत नाही. मैदानाचे ९० टक्के समतलीकरण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला होता. परंतु, त्यात तथ्य आढळून आले नाही. वॉकिंग, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाचे काम अपूर्ण आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अतिक्रमण व मातीगोट्याचे ढिगारे हटविण्याशिवाय दुसरे कोणतेच ठोस काम झाले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.आदेशातील इतर निरीक्षणे१ - कस्तुरचंद पार्कचा उपयोग मुंबईतील ओव्हल मैदानासारखा झाला पाहिजे. त्यासाठी कस्तुरचंद पार्कचा गौरव परत आणणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य नागरिकांना या मैदानावर खेळता आले पाहिजे.२ - मैदानावरील खोदकामात ऐतिहासिक तोफ आढळून आल्या. परंतु, जनतेला ऐतिहासिक मूल्ये व भव्यता दाखविण्यासाठी त्या तोफ मैदानावर प्रदर्शित करण्यात आल्या नाहीत.३ - स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, ड्रेनेज लाईन इत्यादी कामे अर्धवट आहेत. ४ कोटी ५२ लाख रुपये निधीतून ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे.४ - मैदानावरील स्मारकाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. बांधकाम फुटले आहे. खिटक्या तुटल्या आहेत. स्मारकाचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. स्मारक जीर्ण होत आहे.

 

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क