शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

...येथे मिळतो विकतचा आजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:17 AM

रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत.

ठळक मुद्देलोकमत स्टिंग आॅपरेशनरस्त्यावर शिजते अन्नदूषित व उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्य धोक्यातरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सचे धक्कादायक चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कसुमेध वाघमारे/दयानंद पाईकरावनागपूर : रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत. आजार देणारे हे हॉटेल्स सर्वांदेखत सुरू असतानाही प्रशासन मात्र मूकदर्शक बनले आहे.सोमवारी ‘लोकमत’ चमूने या गंभीर प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या हॉटेल्सचालकांचे चांगलेच फावत असल्याचे वास्तव समोर आले.एकाच ठिकाणी ४० वर हॉटेल्समध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या समोरील पुलाखालील साधारण ४० वर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. नागपुरात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत हॉटेल्स असणारे हे एकमेव ठिकाण आहे. परंतु यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’चमूला दिसून आले. जिथे उभे राहणेही किळसवाणे आहे, तिथे लोक पैसे देऊन जेवत होती.बहुसंख्य हॉटेल्सचे किचन रस्त्यावरचरेल्वे स्थानकासमोरील बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावलेली आहे. त्यामुळे फोडणी देताना सगळे पदार्थ रस्त्याच्या शेजारीच ठेवून सगळी प्रक्रिया पार पाडते. वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ उडून अन्नात मिसळते. हेच धुळीत शिजविलेले अन्न हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या थाळीत येते.भाज्यापासून अन्नही उघड्यावरचरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये काऊंटरवर दर्शनी भागात फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, टमाटर या भाज्यांचे उघड्यावरच प्रदर्शन लावले जाते. दिवसभर रस्त्यावरील धूळ उडून या भाज्यांवर साचते. मग एखादा ग्राहक आला की लगेच त्याच्यासमोर ताजी चिरलेली भाजी करण्याचा आव आणून न धुताच या भाज्या कापून त्यांना फोडणी दिली जाते. शिजलेला भात फूटपाथवरएका हॉटेलमध्ये तर कमालीचा बेजबाबदारपणा पाहावयास मिळाला. या हॉटेलमधील कर्मचारी शिजण्यासाठी टाकलेल्या भातातील पाणी काढून टाकण्यासाठी एका गाळणीत शिजलेला भात टाकला. ही गाळणी तशीच फूटपाथवर ठेवली. पाणी निघून जाईपर्यंत हा भात तसाच फूटपाथवर होता. त्याच्या शेजारून लोकांची ये-जा सुरू होती.मद्यपींसाठी विशेष सोयरेल्वे स्थानकासमोरील काही हॉटेल्समध्ये मद्यपींसाठी विशेष सोय केली आहे. ही माहिती देण्यासाठी हॉटेलसमोरच काही माणसांना उभे केले आहे. यामुळे ही हॉटेल्स मिनी बीअर बार झाली आहेत. काहीमध्ये लपूनछपून तर काहींमधून सर्रास दारू पिणारे दिसून आले.हॉटेलचा आत आणि बाहेरचा परिसरही अस्वच्छहॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी मंडळी नीटनेटकी तथा स्वच्छतेला प्राधान्य देणारी असावीत. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वयंपाकगृह नियमित चकचकीत असायला हवे. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते, त्या स्वच्छ पाण्याने धुतलेली असावीत. पाण्याचे ग्लासही आतून-बाहेरून स्वच्छ असायला हवे. परंतु रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सला पाहून ‘स्वच्छ’ कशाला म्हणतात, हा प्रश्न पडतो. येथे हॉटेलच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणचा परिसर अस्वच्छ आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfoodअन्न