शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By मंगेश व्यवहारे | Updated: December 11, 2023 11:27 IST

सध्या राज्यात कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे.

नागपूर : सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पीकपाहणी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून गतीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कापूस, धान, तूर यांच्या नुकसानीचे आकडे पंचनामे पूर्ण केल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

सध्या राज्यात कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलचा मुद्दा पेटलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,‘कांदाप्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी भेटले आहेत. तर इथेनॉल संदर्भात मी स्वत: काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. आता हा प्रश्न दिल्लीस्तरावर असल्याने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांशी भेट घ्यावी लागणार आहे. त्यानुसार, सभागृह सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकून आम्ही दिल्लीला जाऊ आणि यावर तोडगा काढू.’ पुरवणी मागण्यांमध्ये ४० हजार कोटींचा निधी सत्ताधारी आमदारांना दिल्याची टीका विरोधीपक्ष करत आहे. ती टीका तथ्यहीन असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

सध्या मंत्रिमंडळ विस्तार नाहीसध्या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न नाही. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना मदत करणे, कांदाप्रश्न आणि इथेनॉलचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना सरकारचे प्राधान्य राहणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर ते जेव्हा निर्णय घेतील तेव्हा विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  

टिकणारे मराठा आरक्षण देणारमराठा आरक्षण हे कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत असलेले आणि टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आणि टिकणारे मराठा आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन