शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

मासिक पाळीनंतर खुंटते उंची : केवळ दोन इंच वाढते उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:57 IST

पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.

ठळक मुद्देबालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांची माहिती५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ची सुरुवात

आॅनलाईन लोकमतनागपूर : पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.बालरोग अकादमीच्यावतीने गुरुवारपासून रेशीमबाग परिसरात ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ची सुरुवात झाली. या परिषदेत डॉ. मंगतानी सहभागी झाले असून ते पत्रकारांशी बोलत होते.डॉ. मंगतानी म्हणाले, आपल्याकडे मुला-मुलींच्या उंचीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. मुलांची वाढ नैसर्गिक होते, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, जेव्हा मुलाची उंची वाढत नाही तेव्हाच आई-वडील डॉक्टरांकडे जातात. यातही उंची जास्त असेल तर डॉक्टरांकडे जात नाही. परंतु या दोन्ही स्थितीत लवकरात लवकर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला फायद्याचा ठरतो. यावर उपचार आहेत.शंभरात तीन मुलांमध्ये उंचीची समस्याडॉ. मंगतानी म्हणाले, लहान मुलांमध्ये कमी उंचीचे प्रमाण १०० मध्ये ३ असे आहे तर जास्त उंचीचे प्रमाण १०० मध्ये २ ते ५ असे आहे. मुला-मुलींमध्ये उंची वाढत नसेल किंवा अति उंच होत चालला असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थायरॉईड, ग्रोथ हार्माेनची कुठली समस्या आहे याचे निदान करून त्यावर उपचार केला जाऊ शकतो.दोन-तीन वर्षे एकाच मापाचे शर्ट होत असेल तर धोकाडॉ. मंगतानी म्हणाले, जर दोन ते तीन वर्षे मुलाला एकाच मापाचे शर्ट होत असेल, शूजच्या आकार वाढलेला नसेल, तर मुलामध्ये काहीतरी समस्या आहे हे पालकांनी ओळखायला हवे. यावर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.अतिलवकर वयात आल्यास उंचीवर परिणाममुलींमध्ये ११ ते १३ वर्षांमध्ये मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे तर मुलांमध्ये कमी वयातच चेहऱ्यावर केस वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. अति लवकर वयात येण्याच्या या समस्येमुळे उंचीवर परिणाम होतो. उंची खुंटते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ही समस्या मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार हा आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर