शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

By निशांत वानखेडे | Updated: June 17, 2024 19:17 IST

२४ ते ४८ तासात मान्सून आगमनाची शक्यता : शहरात १८ मिमी पावसाची नाेंद

नागपूर : नवतप्यापासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना साेमवारी अखेर पावसाचा गारवा मिळाला. दुपारनंतर शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात जाेरदार पावसाने धडक दिली. तास-दीड तास चाललेल्या मुसळधार पावसाने मातीला चिंब भिजविले व उकाडा काढून घेतला. मात्र या मान्सूनच्या नाही तर पूर्व माेसमी पावसाच्या सरी आहेत व येत्या २४ ते ४८ तासात माेसमी पावसाचे आगमन हाेऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.

२३ मे ते २ जूनपर्यंत नवतप्याचा भयंकर ताप आणि ३ जूनपासून १६ जूनपर्यंत पूर्वमाेसमी बाष्पाने वाढलेल्या उकाड्याने नागरिकांचे हालहाल करून साेडले. त्यामुळे कधी एकदा माेसमी पाऊस पडेल, याची प्रतीक्षा लाेकांना हाेती. मान्सूनचे देशात व त्यानंतर महाराष्ट्रातही लवकर आगमन हाेऊनही विदर्भातील नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. अकाेला, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूरला काही प्रमाणात पूर्व माेसमीच्या सरी बरसल्या, पण त्याचा आनंद फार काळचा नव्हता व पुन्हा पावसाने दडी मारली. नागपूरसह पूर्व विदर्भाचे बहुतेक जिल्हे या पावसापासूनही वंचित हाेते.या दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर साेमवार १७ जूनला नागपूर जिल्ह्यात वादळ व विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाने जाेरदार धडक दिली. दुपारी ४ वाजतापासून मुसळधार पाऊस सुरू झाला, जाे तासभर सुरू हाेता. त्यानंतरही रिपरिप चालली हाेती. शहरात सायंकाळी ५ वाजतापर्यंत १८ मिमी पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात काटाेल, नरखेड, रामटेक, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर ग्रामीण या भागात पावसाची हजेरी हाेती. कामठी, माैदा, पारशिवनी, उमरेड, भिवापूर, कुही या भागात मात्र हजेरी नव्हती.

शेतकऱ्यांनी करू नये पेरणीची घाई

- विदर्भात अजुनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. नागपूर झालेला पाऊस हा पूर्वमाेसमी पाऊस असून ताेही ठराविक भागात आहे.- बंगालची शाखा लवकरच झेपावणार असल्याने पुढच्या दाेन दिवसात कधीही मान्सूनचे आगमन हाेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.- यानंतर २५ ते २८ जून या काळात विदर्भातील बहुतेक भागात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.- शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत पेरणीची घाई करू नये. बहुतेक खरीप पिकांची १५ जुलैपर्यंत पेरणीची मर्यादा आहे.- धुळ पेरणी केली तर येणारे पिक परतीच्या पावसात सापडून नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दाेन चार दिवस उशीरा पेरणी केल्यास पिकांच्या वाढीवर व उत्पादनावरही फारसा परिणाम हाेत नाही, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस