शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

By निशांत वानखेडे | Updated: June 17, 2024 19:17 IST

२४ ते ४८ तासात मान्सून आगमनाची शक्यता : शहरात १८ मिमी पावसाची नाेंद

नागपूर : नवतप्यापासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना साेमवारी अखेर पावसाचा गारवा मिळाला. दुपारनंतर शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात जाेरदार पावसाने धडक दिली. तास-दीड तास चाललेल्या मुसळधार पावसाने मातीला चिंब भिजविले व उकाडा काढून घेतला. मात्र या मान्सूनच्या नाही तर पूर्व माेसमी पावसाच्या सरी आहेत व येत्या २४ ते ४८ तासात माेसमी पावसाचे आगमन हाेऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.

२३ मे ते २ जूनपर्यंत नवतप्याचा भयंकर ताप आणि ३ जूनपासून १६ जूनपर्यंत पूर्वमाेसमी बाष्पाने वाढलेल्या उकाड्याने नागरिकांचे हालहाल करून साेडले. त्यामुळे कधी एकदा माेसमी पाऊस पडेल, याची प्रतीक्षा लाेकांना हाेती. मान्सूनचे देशात व त्यानंतर महाराष्ट्रातही लवकर आगमन हाेऊनही विदर्भातील नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. अकाेला, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूरला काही प्रमाणात पूर्व माेसमीच्या सरी बरसल्या, पण त्याचा आनंद फार काळचा नव्हता व पुन्हा पावसाने दडी मारली. नागपूरसह पूर्व विदर्भाचे बहुतेक जिल्हे या पावसापासूनही वंचित हाेते.या दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर साेमवार १७ जूनला नागपूर जिल्ह्यात वादळ व विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाने जाेरदार धडक दिली. दुपारी ४ वाजतापासून मुसळधार पाऊस सुरू झाला, जाे तासभर सुरू हाेता. त्यानंतरही रिपरिप चालली हाेती. शहरात सायंकाळी ५ वाजतापर्यंत १८ मिमी पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात काटाेल, नरखेड, रामटेक, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर ग्रामीण या भागात पावसाची हजेरी हाेती. कामठी, माैदा, पारशिवनी, उमरेड, भिवापूर, कुही या भागात मात्र हजेरी नव्हती.

शेतकऱ्यांनी करू नये पेरणीची घाई

- विदर्भात अजुनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. नागपूर झालेला पाऊस हा पूर्वमाेसमी पाऊस असून ताेही ठराविक भागात आहे.- बंगालची शाखा लवकरच झेपावणार असल्याने पुढच्या दाेन दिवसात कधीही मान्सूनचे आगमन हाेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.- यानंतर २५ ते २८ जून या काळात विदर्भातील बहुतेक भागात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.- शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत पेरणीची घाई करू नये. बहुतेक खरीप पिकांची १५ जुलैपर्यंत पेरणीची मर्यादा आहे.- धुळ पेरणी केली तर येणारे पिक परतीच्या पावसात सापडून नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दाेन चार दिवस उशीरा पेरणी केल्यास पिकांच्या वाढीवर व उत्पादनावरही फारसा परिणाम हाेत नाही, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस