शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

टेकडी गणेश मंदिरात निवडणुकीपूर्वी तापले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:08 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे.

ठळक मुद्देमंदिराच्या कारभारात भ्रष्टाचाराचा आरोप : वर्तमान कार्यकारिणीचे प्रत्युत्तर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे. विश्वस्त मंडळाच्या वर्तमान पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर मंडळाचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी उत्तर देत विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.मंडळातील माधव कोहळे, कोषाध्यक्ष संजय जोगळेकर, विश्वस्त निशिकांत सगदेव व लखीचंद ढोबळे यांनी पत्रपरिषद घेउन मंदिराच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मंदिर परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून निविदा न काढता नवीन कॅमेरे खरेदी करण्यात आले. मंदिरात स्टेनलेस स्टीलची रेलिंग लावण्यात आली, मात्र ६.५० लाख रुपयांचा माल निविदा न काढता खरेदी करण्यात आला. मोहगाव झिल्पी येथे दानरुपात मिळालेल्या ४.८५ एकर जमिनीवर निविदा काढून काम करण्याचा ठराव झाला असताना तसे न करता मंदिर विकासाचे काम सुरू करण्यात आल्याचे ढोबळे यांनी सांगितले. एकही सदस्य येथे चर्च करण्यास इच्छुक नसताना लाखो रुपये खर्च करण्यात आले. अशा विविध कामात तसेच टेकडी मंदिराच्या बांधकामातही लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पॅनलच्या या सदस्यांनी केला आहे. सचिव कुळकर्णी हे मंदिराच्या पैशातून नाहक विमान यात्रा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.मंडळाचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी पत्रकाद्वारे या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. नवीन सीसीटीव्ही खरेदी, रेलिंग खरेदी सर्व सभासदांच्या देखरेखीत झाली आहे. मोहगाव झिल्पीचे काम सर्व सभासदांच्या संमतीनेच सुरू करण्यात आले असून हे स्थान पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंदिरातील दुसरी गणेश मूर्ती व महालक्ष्मीची मूर्ती सर्व सदस्यांच्या परवानगीनेच करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुठलाही भ्रष्टाचार न करता मंदिराची विकासकामे सुरू आहेत. मात्र विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारे आरोप करून गणेश मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी राजकारण करीत असल्याची टीका श्रीराम कुळकर्णी यांनी पत्रकातून केली आहे.

टॅग्स :Tekdi Ganesh Mandirटेकडी गणेश मंदिरElectionनिवडणूकnagpurनागपूर