शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

By सुमेध वाघमार | Updated: June 28, 2025 19:46 IST

डॉ. जे.सी. मोहन : ‘ईको’ नागपूर परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ आले एकत्र

नागपूर : ‘हार्ट फेल्युअर’ ही एक अशी स्थिती आहे जिथे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात किंवा कडक होतात, ज्यामुळे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. ही एक गंभीर स्थिती असलीतरी यावर नवी औषधे इतकी प्रभावी ठरत आहेत की जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये पुन्हा हृदयाचे कार्य सुरळीत करता येते. याशिवाय ५० टक्के रुग्णांवर आता प्रभावी नियंत्रण ठेवता येते, अशी माहिती सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. सी. मोहन यांनी दिली.   

‘इको नागपूर परिषद-२०२५’मध्ये ते मुख्य वक्ता म्हणून सहभागी झाले असताना ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मोहन म्हणाले, ‘हार्ट फेल्युअर’ आणि ‘हार्ट अटॅक’ यात मोठा फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये अचानक रक्तपुरवठा थांबतो, तर ‘हार्ट फेल्युअर’मुळे रक्त पंप करण्याचे क्षमता कमी होत जाते. शरीराच्या अवयवांना पुरेसा आॅक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. भारतातील जवळपास एक कोटी प्रौढ व्यक्तींना ‘हार्ट फेल्युअर’चा त्रास आहे.

‘हार्ट फेल्युअर’चे परिणाम कॅन्सरपेक्षाही वाईटदुर्देवाने ‘हार्ट फेल्युअर’ या आजाराचा परिणाम अनेकदा काही कॅन्सरपेक्षाही वाईट असतो. कारण हा आजार ओळखला जात नाही, कमी गांभीर्याने घेतला जातो आणि वेळेवर उपचार होत नाहीत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºयांना ह्या आजाराचा धोका अधिक आहे, असेही डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले. 

नव्या औषधांमुळे आयुष्य वाढवता येते‘हार्ट फेल्युअर’ असलेल्या रुग्णांचे आयुष्य नव्या औषधांमुळे जवळपास सहा ते आठ वर्षांनी वाढवता येते. यासाठी लवकर निदान, योग्य औषधे आणि उपचार आवश्यक असतो. ईको, ईसीजी आणि काही रक्ततपासण्यांमधून या आजाराचे निदान केले जाते.

भारतीयांना कोलेस्टेरॉलची अधिक काळजी घ्यावीया परिषदेत लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष, डॉ. विनोद विजन यांनीही महत्त्वाचे निरीक्षण मांडले. भारतीयांची शरीररचना आणि आनुवंशिकता लक्षात घेता, भारतीयांनी जागतिक प्रमाणापेक्षा किमान १० पॉईंट्सने कमी कोलेस्टेरॉल टार्गेट ठेवायला हवे. 

‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र‘ईको परिषदे’चे कार्यक्रम संचालक डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, हे ‘ईको’चे २१ वे वर्ष असून, आज सर्वसामान्य लोकही ‘इकोकार्डियोग्राफी’बद्दल जागरूक झाले आहेत. ‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र झाले आहे. या तंत्रज्ञानामळे हृदयातील त्रास लवकर ओळखता येतो. ४० वर्षांनंतर दरवर्षी ईको तपासणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील हृदयरोग तज्ज्ञ एकत्र आले आहेत. परिषदेतील विविध व्याख्यानांतून हृदयाच्या आजारांचे लवकर निदान, अचूक उपचार व बहुविशेषज्ञांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगnagpurनागपूर