शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

By सुमेध वाघमार | Updated: June 28, 2025 19:46 IST

डॉ. जे.सी. मोहन : ‘ईको’ नागपूर परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ आले एकत्र

नागपूर : ‘हार्ट फेल्युअर’ ही एक अशी स्थिती आहे जिथे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात किंवा कडक होतात, ज्यामुळे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. ही एक गंभीर स्थिती असलीतरी यावर नवी औषधे इतकी प्रभावी ठरत आहेत की जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये पुन्हा हृदयाचे कार्य सुरळीत करता येते. याशिवाय ५० टक्के रुग्णांवर आता प्रभावी नियंत्रण ठेवता येते, अशी माहिती सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. सी. मोहन यांनी दिली.   

‘इको नागपूर परिषद-२०२५’मध्ये ते मुख्य वक्ता म्हणून सहभागी झाले असताना ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मोहन म्हणाले, ‘हार्ट फेल्युअर’ आणि ‘हार्ट अटॅक’ यात मोठा फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये अचानक रक्तपुरवठा थांबतो, तर ‘हार्ट फेल्युअर’मुळे रक्त पंप करण्याचे क्षमता कमी होत जाते. शरीराच्या अवयवांना पुरेसा आॅक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. भारतातील जवळपास एक कोटी प्रौढ व्यक्तींना ‘हार्ट फेल्युअर’चा त्रास आहे.

‘हार्ट फेल्युअर’चे परिणाम कॅन्सरपेक्षाही वाईटदुर्देवाने ‘हार्ट फेल्युअर’ या आजाराचा परिणाम अनेकदा काही कॅन्सरपेक्षाही वाईट असतो. कारण हा आजार ओळखला जात नाही, कमी गांभीर्याने घेतला जातो आणि वेळेवर उपचार होत नाहीत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºयांना ह्या आजाराचा धोका अधिक आहे, असेही डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले. 

नव्या औषधांमुळे आयुष्य वाढवता येते‘हार्ट फेल्युअर’ असलेल्या रुग्णांचे आयुष्य नव्या औषधांमुळे जवळपास सहा ते आठ वर्षांनी वाढवता येते. यासाठी लवकर निदान, योग्य औषधे आणि उपचार आवश्यक असतो. ईको, ईसीजी आणि काही रक्ततपासण्यांमधून या आजाराचे निदान केले जाते.

भारतीयांना कोलेस्टेरॉलची अधिक काळजी घ्यावीया परिषदेत लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष, डॉ. विनोद विजन यांनीही महत्त्वाचे निरीक्षण मांडले. भारतीयांची शरीररचना आणि आनुवंशिकता लक्षात घेता, भारतीयांनी जागतिक प्रमाणापेक्षा किमान १० पॉईंट्सने कमी कोलेस्टेरॉल टार्गेट ठेवायला हवे. 

‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र‘ईको परिषदे’चे कार्यक्रम संचालक डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, हे ‘ईको’चे २१ वे वर्ष असून, आज सर्वसामान्य लोकही ‘इकोकार्डियोग्राफी’बद्दल जागरूक झाले आहेत. ‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र झाले आहे. या तंत्रज्ञानामळे हृदयातील त्रास लवकर ओळखता येतो. ४० वर्षांनंतर दरवर्षी ईको तपासणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील हृदयरोग तज्ज्ञ एकत्र आले आहेत. परिषदेतील विविध व्याख्यानांतून हृदयाच्या आजारांचे लवकर निदान, अचूक उपचार व बहुविशेषज्ञांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगnagpurनागपूर