शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

स्वतंत्र विदर्भ घेणारच

By admin | Updated: May 9, 2016 03:08 IST

विदर्भातील दारिद्र्य संपवून येथे संपन्नता आणावयाची असेल तर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती : सरकारला ३१ डिसेंबरची डेडलाईन नागपूर : विदर्भातील दारिद्र्य संपवून येथे संपन्नता आणावयाची असेल तर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विदर्भाचा तीव्र लढा उभारून कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ मिळवू, असा निर्धार रविवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आमदार निवास येथे आयोजित विदर्भवादी युवकांच्या कार्यशाळेत करण्यात आला. समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती अरविंद देशमुख,अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील, हेमराज रहाटे, विनायक खोरगडे, डॉ. दीपक मुंढे, प्रदीप धामणकर, निखिल गवळी, अर्चना नंदगडे आदी उपस्थित होते. गेली ५६ वर्षे महाराष्ट्रात राहूनही विदर्भ करारानुसार विदर्भाचा संतुलित विकास झालेला नाही. सन्मानाने व सुखाने जगण्यासारखी परिस्थिती विदर्भात राहिलेली नाही. येथील जनतेच्या वाट्याला दारिद्र्य, निराशा व आत्महत्या आल्या आहेत. बेरोजगारी, घटलेले दरडोई उत्पन्न, उद्योगांचा अभाव, लोकसंख्येच्या आधारावर हक्काचा न मिळालेला निधी, निर्माण झालेला सिंचनाचा अनुशेष, यामुळे विदर्भाची अधोगती होत आहे. विदर्भाला गतवैभव मिळवून देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ हाच त्यावर रामबाण उपाय असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड. वामनराव चटप यांनी सांगितले. विदर्भ सर्वदृष्टीने सक्षम आहे. त्यामुळे याचा आढावा घेण्याची गरज नाही. राज्यकर्त्यानी आजवर विदर्भाची उपेक्षाच केली आहे. विदर्भ वेगळा झाला तर सक्षम राज्य होणार नाही, अशी भीती राज्यकर्त्यांकडून दाखविली जाते. परंतु विदर्भ सर्वात मोठा प्रदेश असून संपन्न आहे. संविधानात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही घटनेतील तरतुदीनुसारच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत असल्याचे श्रीनिवास खांदेवाले यांनी विदर्भ राज्य आर्थिक, सामाजिक व राजकीय चिंतन या विषयावर बोलताना सांगितले.मराठी भाषिक राज्याचे दोन तुकडे होऊ देणार नाही, अशी भूमिका काही राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे. परंतु या संदर्भात केंद्र सरकारला निर्णय घ्यावयाचा आहे. स्वतंत्र विदर्भासाठी युवकांचा आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन यशस्वी झाल्याने विदर्भवाद्यात उत्साहाचे वातावरण आहे. यात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ५० कोटी लोकांना पुरेल इतके धान्य नव्हते. आज १२५ कोटी लोकसंख्येला पुरून उरेल इतके अन्नधान्याचे उत्पादन आहे. परंतु शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भात सर्वाधिक ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी राज्यात विदर्भाचा विकास शक्य नाही. राज्यक र्त्याचीही अशी मानसिकता नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हणत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाचे लेखी आश्वासन दिले होेते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे म्हणतात. यामुळे विदर्भाच्या मुद्यावर संभ्रम निर्माण क रीत असल्याचा आरोप राम नेवले यांनी केला. अरविंद देशमुख यांनी विदर्भ वेगळा झाला तर सक्षम राज्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्चना नंदगडे यांनी आंदोलनात महिलांचा सहभाग वाढविण्याची मागणी केली. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)१ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन३१ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भासंदर्भात निर्णय न घेतल्यास १ जानेवारी २०१७ पासून समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वामनराव चटप यांनी दिला. युवा आघाडीची कार्यकारिणी जाहीरविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात पूर्व विदर्भ प्रमुख म्हणून डॉ. दीपक मुंढे तर पश्चिम विदर्भाची जबाबदारी प्रदीप धामणकर यांच्यावर सोपविण्यात आली.