शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...शेवटी तो ‘बळी’राजाच : विदर्भात रोज चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: December 10, 2023 23:57 IST

सरकार कुणाचेही असो, बळीराजाच्या नशिबी मरणयातनाच : दशकातील आत्महत्यांचा परमोच्च बिंदू पावणेतीन वर्षांत

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यात वर्षातून तीनदा विधिमंडळाचे अधिवेशन होते व बहुतांश वेळा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच गोंधळ होतो. मात्र सरकार कुठलेही असले तरी प्रत्यक्षात बांधावरील शेतकऱ्याला मात्र दिलासा मिळत नसल्याचेच चित्र आहे. या वर्षभरात विदर्भात दर दिवसाला सरासरी चारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे मागील दशकभरातील आकडेवारीचा परमोच्च बिंदू मागील पावणेतीन वर्षांतच दिसून आला आहे. विदर्भाच्या भूमीत अधिवेशन होत असताना ही आकडेवारी सत्ताधारी व विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन टाकणारी आहे.

शेतकऱ्यांच्या मरणयातनेवर राजकारण बाजूला ठेवून शाश्वत उपाययोजनांवर मंथन करतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘लोकमत’ला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२३ साली विदर्भातील अमरावती विभागात १० महिन्यांतच ९५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १० महिन्यांत विदर्भात १ हजार २०८ शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे स्वत:चा जीव द्यावा लागला. सरासरी दररोज चार शेतकऱ्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

-पावणेतीन वर्षांत सव्वाचार हजारांहून अधिक आत्महत्या

कोरोनाचे कुचक्र सुरू झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना घोषित केल्या. मात्र कधी अवकाळी तर कधी दुष्काळ, कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात शेतकरी अडकतच गेला. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या ३४ महिन्यांच्या कालावधीतच विदर्भात ४ हजार ३३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात अमरावती विभागातील सर्वाधिक ३ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले.

-२५ हजारांचा आकडा पार, २०२२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या

२००१ सालापासून विदर्भात २५ हजार ४२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात नागपूर विभागातील ५ हजार ५०८ तर अमरावती विभागातील १९ हजार ८१७ आत्महत्यांचा समावेश आहे. जर दशकभराच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २०२० नंतर आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढत गेले. २०२२ मध्ये सर्वाधिक १ हजार ५६३ तर २०२१ मध्ये १ हजार ५६० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले.

-खरिपाच्या काळात सर्वाधिक दाहकता

यंदा शेतकऱ्यांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यावर पावसाने पाठ फिरवली व अनेक जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली. यात शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. सप्टेंबर महिन्यात १३६ तर ऑगस्ट महिन्यात १३० शेतकऱ्यांनी जीव दिला.

-२०२३ मधील महिनानिहाय दाहकतामहिना : आत्महत्याजानेवारी : १२९फेब्रुवारी : ९६मार्च : १२६एप्रिल : १०८मे : १२०जून : ११४जुलै : १२२ऑगस्ट : १३०सप्टेंबर : १३६ऑक्टोबर : १२७

-२०२१ पासूनच्या आत्महत्यावर्ष : आत्महत्या२०२१ : १,५६०२०२२ : १,५६३२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) : १,२०८

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी