शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...शेवटी तो ‘बळी’राजाच : विदर्भात रोज चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: December 10, 2023 23:57 IST

सरकार कुणाचेही असो, बळीराजाच्या नशिबी मरणयातनाच : दशकातील आत्महत्यांचा परमोच्च बिंदू पावणेतीन वर्षांत

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यात वर्षातून तीनदा विधिमंडळाचे अधिवेशन होते व बहुतांश वेळा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच गोंधळ होतो. मात्र सरकार कुठलेही असले तरी प्रत्यक्षात बांधावरील शेतकऱ्याला मात्र दिलासा मिळत नसल्याचेच चित्र आहे. या वर्षभरात विदर्भात दर दिवसाला सरासरी चारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे मागील दशकभरातील आकडेवारीचा परमोच्च बिंदू मागील पावणेतीन वर्षांतच दिसून आला आहे. विदर्भाच्या भूमीत अधिवेशन होत असताना ही आकडेवारी सत्ताधारी व विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन टाकणारी आहे.

शेतकऱ्यांच्या मरणयातनेवर राजकारण बाजूला ठेवून शाश्वत उपाययोजनांवर मंथन करतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘लोकमत’ला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२३ साली विदर्भातील अमरावती विभागात १० महिन्यांतच ९५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १० महिन्यांत विदर्भात १ हजार २०८ शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे स्वत:चा जीव द्यावा लागला. सरासरी दररोज चार शेतकऱ्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

-पावणेतीन वर्षांत सव्वाचार हजारांहून अधिक आत्महत्या

कोरोनाचे कुचक्र सुरू झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना घोषित केल्या. मात्र कधी अवकाळी तर कधी दुष्काळ, कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात शेतकरी अडकतच गेला. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या ३४ महिन्यांच्या कालावधीतच विदर्भात ४ हजार ३३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात अमरावती विभागातील सर्वाधिक ३ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले.

-२५ हजारांचा आकडा पार, २०२२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या

२००१ सालापासून विदर्भात २५ हजार ४२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात नागपूर विभागातील ५ हजार ५०८ तर अमरावती विभागातील १९ हजार ८१७ आत्महत्यांचा समावेश आहे. जर दशकभराच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २०२० नंतर आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढत गेले. २०२२ मध्ये सर्वाधिक १ हजार ५६३ तर २०२१ मध्ये १ हजार ५६० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले.

-खरिपाच्या काळात सर्वाधिक दाहकता

यंदा शेतकऱ्यांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यावर पावसाने पाठ फिरवली व अनेक जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली. यात शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. सप्टेंबर महिन्यात १३६ तर ऑगस्ट महिन्यात १३० शेतकऱ्यांनी जीव दिला.

-२०२३ मधील महिनानिहाय दाहकतामहिना : आत्महत्याजानेवारी : १२९फेब्रुवारी : ९६मार्च : १२६एप्रिल : १०८मे : १२०जून : ११४जुलै : १२२ऑगस्ट : १३०सप्टेंबर : १३६ऑक्टोबर : १२७

-२०२१ पासूनच्या आत्महत्यावर्ष : आत्महत्या२०२१ : १,५६०२०२२ : १,५६३२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) : १,२०८

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी