शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'त्याने' आधी विष घेतले.. नंतर गळफासही लावला... पण, सुदैवाने वाचला जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 20:46 IST

Nagpur News हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. नंतर घरी जाऊन गळफास लावला. मात्र त्याच्या पत्नीने ऐनवेळी येऊन त्याचे प्राण वाचवल्याची घटना नरखेड तालुक्यात घडली.

ठळक मुद्देव्हेंटिलेटरवर काढले तब्बल २० दिवसपत्नी, वडील, डॉक्टरांच्या प्रयत्नाने मिळाले नवे जीवन

नागपूर : आर्थिक संकटामुळे हताश झालेल्या ३५ वर्षीय शेतक-याने जहाल विषप्राशन केले, गळफासही लावला. मरणाच्या दारात तो उभा होता. त्याचवेळी पत्नीचे लक्ष घराकडे गेले. बंद दारातून पती फासावर लटकताना पाहताच तिने आरडाओरड केली. शेजारीच असलेल्या वडिलाने धाव घेतली. छतावरून आत उडी मारत त्याला फासावरून काढले. बेशुद्धावस्थेतच मेडिकलमध्ये भरती केले. तब्बल २० दिवस शर्थीचे उपचार चालले आणि अखेर तो शुद्धीवर आला. पत्नी, वडील व डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याला नवे जीवन मिळाले.

नरखेड तालुक्यातील एका छोट्याशा गावात ३५ वर्षीय गणेश (बदललेले नाव) पत्नी व वडिलांसोबत राहतो. त्याला तीन वर्षांचा व दोन महिन्यांच्या मुलगा आहे. गणेश व्यवसायाने शेतकरी. परंतु, एक एकरच्या शेतीवर घरातील जबाबदा-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तो नैराश्येत जगत होता. ५ डिसेंबर रोजी त्याने शेतीवर जाऊन कीटकनाशक प्राशन केले. घरी आल्यावर आतून दाराला कुलूप लावले. पाळण्यातील दोन महिन्यांच्या बाळाचे लाड केले. पाळण्याची दोरी काढली. छताला दोरी बांधून गळफास लावला. त्याचवेळी पत्नी घरी आली. बंद दारातून आत डोकावून पाहिल्यावर गळफासावर लटकलेला व आचके देत असलेला पती पाहता तिने हंबरडा फोडला. मदतीसाठी ओरडायला लागली. शेजारीच असलेले गणेशचे वडील धावत येऊन घराच्या छतावर चढले. काैले बाजूला करीत आत उडी घेतली. मुलाला गळफासातून बाहेर काढले. गणेश बेशुद्ध झाला होता. शेजा-यांच्या मदतीने नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. डॉक्टरांचे शर्तीचे उपचार, पत्नी व वडिलांनी न सोडलेली आशा यामुळे तब्बल २० दिवसांनंतर गणेश व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. गणेशला जीवनदान दिल्याबद्दल त्याच्या वडिलांनी व पत्नीने डॉक्टरांचे आभार मानले.

वाचण्याची शक्यता फारच कमी होती

विष घेतले आणि गळफासही लावून घेतला, त्यानंतर नागपुरात पोहोचण्यास लागलेले दीड ते दोन तास अशा स्थितीत रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. मेडिकलमध्ये त्याला दाखल केले तेव्हा त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. विष फुफ्फुसापर्यंत पोहोचले होते. गळफासामुळे त्याला श्वासही घेता येत नव्हता. परंतु, आयसीयूच्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तो वाचू शकला.

-डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिकल

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या