शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

'त्याने' आधी विष घेतले.. नंतर गळफासही लावला... पण, सुदैवाने वाचला जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 20:46 IST

Nagpur News हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. नंतर घरी जाऊन गळफास लावला. मात्र त्याच्या पत्नीने ऐनवेळी येऊन त्याचे प्राण वाचवल्याची घटना नरखेड तालुक्यात घडली.

ठळक मुद्देव्हेंटिलेटरवर काढले तब्बल २० दिवसपत्नी, वडील, डॉक्टरांच्या प्रयत्नाने मिळाले नवे जीवन

नागपूर : आर्थिक संकटामुळे हताश झालेल्या ३५ वर्षीय शेतक-याने जहाल विषप्राशन केले, गळफासही लावला. मरणाच्या दारात तो उभा होता. त्याचवेळी पत्नीचे लक्ष घराकडे गेले. बंद दारातून पती फासावर लटकताना पाहताच तिने आरडाओरड केली. शेजारीच असलेल्या वडिलाने धाव घेतली. छतावरून आत उडी मारत त्याला फासावरून काढले. बेशुद्धावस्थेतच मेडिकलमध्ये भरती केले. तब्बल २० दिवस शर्थीचे उपचार चालले आणि अखेर तो शुद्धीवर आला. पत्नी, वडील व डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याला नवे जीवन मिळाले.

नरखेड तालुक्यातील एका छोट्याशा गावात ३५ वर्षीय गणेश (बदललेले नाव) पत्नी व वडिलांसोबत राहतो. त्याला तीन वर्षांचा व दोन महिन्यांच्या मुलगा आहे. गणेश व्यवसायाने शेतकरी. परंतु, एक एकरच्या शेतीवर घरातील जबाबदा-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तो नैराश्येत जगत होता. ५ डिसेंबर रोजी त्याने शेतीवर जाऊन कीटकनाशक प्राशन केले. घरी आल्यावर आतून दाराला कुलूप लावले. पाळण्यातील दोन महिन्यांच्या बाळाचे लाड केले. पाळण्याची दोरी काढली. छताला दोरी बांधून गळफास लावला. त्याचवेळी पत्नी घरी आली. बंद दारातून आत डोकावून पाहिल्यावर गळफासावर लटकलेला व आचके देत असलेला पती पाहता तिने हंबरडा फोडला. मदतीसाठी ओरडायला लागली. शेजारीच असलेले गणेशचे वडील धावत येऊन घराच्या छतावर चढले. काैले बाजूला करीत आत उडी घेतली. मुलाला गळफासातून बाहेर काढले. गणेश बेशुद्ध झाला होता. शेजा-यांच्या मदतीने नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. डॉक्टरांचे शर्तीचे उपचार, पत्नी व वडिलांनी न सोडलेली आशा यामुळे तब्बल २० दिवसांनंतर गणेश व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. गणेशला जीवनदान दिल्याबद्दल त्याच्या वडिलांनी व पत्नीने डॉक्टरांचे आभार मानले.

वाचण्याची शक्यता फारच कमी होती

विष घेतले आणि गळफासही लावून घेतला, त्यानंतर नागपुरात पोहोचण्यास लागलेले दीड ते दोन तास अशा स्थितीत रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. मेडिकलमध्ये त्याला दाखल केले तेव्हा त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. विष फुफ्फुसापर्यंत पोहोचले होते. गळफासामुळे त्याला श्वासही घेता येत नव्हता. परंतु, आयसीयूच्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तो वाचू शकला.

-डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिकल

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या