शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बलात्कारमुक्त देशासाठी 'त्याची' कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 10:50 IST

बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी व देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून नाशिकच्या विनायक निंबाळकर या तरुण पत्रकाराने थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

ठळक मुद्देतरुण पत्रकाराची अशीही जनजागृती : दर दिवशी देशात अत्याचाराची ७७ प्रकरणे

अंकिता देशकर

नागपूर : भारताच्या नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युराेच्या नाेंदीनुसार २०२० साली देशात बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. म्हणजे दर दिवशी तब्बल ७७ बलात्कार. ही केवळ नाेंद झालेली प्रकरणे आहेत आणि खरा आकडा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. विनयभंगाच्या प्रकरणात अनेकदा तक्रारही केली जात नाही. देशातील या वास्तवाने अस्वस्थ झालेल्या एका तरुण पत्रकाराने देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

नाशिक येथील रहिवासी विनायक निंबाळकर असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या यात्रेदरम्यान नागपूरला पाेहचलेल्या विनायक यांच्याशी लाेकमतने संवाद साधला. एक पत्रकार म्हणून नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय आहे. मात्र काेराेना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांतील बहुतेक मथळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे हाेते. त्यावेळी प्रचंड अस्वस्थ वाटत हाेते. त्यामुळे अशा प्रकाराविराेधात लाेकांना जागृत करण्यासाठी काहीतरी करावे, असा निर्धार केला. तेव्हा बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करावी, असा निर्धार केला.

सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे विनायक यांनी सांगितले. देशातील खेडे अद्यापही अंधारात असून महिलांचे स्थान समाजाच्या वंचित घटकांमध्येच माेडते आणि अशा प्रकरणात त्या कधी तक्रारही करीत नाहीत. महामार्गांवर विनयभंगाचे प्रकार खूप घडतात. एखादी मुलगी रस्त्याने जाताना दिसली की माणसे काही ना काही कमेंट करतातच. गावांमध्ये आजही मुली व त्यांचे कुटुंबीय अशा प्रकरणात भीती, प्रतिमा खराब हाेण्याची आणि कुणी लग्न करणार नाही या चिंतेने तक्रार दाखल करीत नाहीत. मात्र काळ बदलत असून लाेकांची मानसिकताही बदलत असल्याचे ते म्हणाले.

विनायक यांनी या यात्रेदरम्यान अनेक गावांना भेट दिली. विशिष्ट मार्ग ठरविला नाही पण यात्रेत गावाेगाव फिरून कारगीलला पाेहचणार असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे विनायक यांच्या यात्रेत केरळचे स्वतंत्र छायाचित्रकार शिव शिवा आणि आंध्रप्रदेशचे बशीर शेख हे दाेन व्यक्तीसुद्धा जुळले गेल्याचे त्यांनी सांगितले.

थोडा बदलही समाधानकारक

या पदयात्रेने समाजात खूप बदल घडेल असे नाही पण जाे थाेडा बदल घडेल ताे समाधानकारक ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या या विषयावर लाेक बाेलू लागतील, हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक