शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारमुक्त देशासाठी 'त्याची' कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 10:50 IST

बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी व देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून नाशिकच्या विनायक निंबाळकर या तरुण पत्रकाराने थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

ठळक मुद्देतरुण पत्रकाराची अशीही जनजागृती : दर दिवशी देशात अत्याचाराची ७७ प्रकरणे

अंकिता देशकर

नागपूर : भारताच्या नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युराेच्या नाेंदीनुसार २०२० साली देशात बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. म्हणजे दर दिवशी तब्बल ७७ बलात्कार. ही केवळ नाेंद झालेली प्रकरणे आहेत आणि खरा आकडा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. विनयभंगाच्या प्रकरणात अनेकदा तक्रारही केली जात नाही. देशातील या वास्तवाने अस्वस्थ झालेल्या एका तरुण पत्रकाराने देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

नाशिक येथील रहिवासी विनायक निंबाळकर असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या यात्रेदरम्यान नागपूरला पाेहचलेल्या विनायक यांच्याशी लाेकमतने संवाद साधला. एक पत्रकार म्हणून नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय आहे. मात्र काेराेना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांतील बहुतेक मथळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे हाेते. त्यावेळी प्रचंड अस्वस्थ वाटत हाेते. त्यामुळे अशा प्रकाराविराेधात लाेकांना जागृत करण्यासाठी काहीतरी करावे, असा निर्धार केला. तेव्हा बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करावी, असा निर्धार केला.

सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे विनायक यांनी सांगितले. देशातील खेडे अद्यापही अंधारात असून महिलांचे स्थान समाजाच्या वंचित घटकांमध्येच माेडते आणि अशा प्रकरणात त्या कधी तक्रारही करीत नाहीत. महामार्गांवर विनयभंगाचे प्रकार खूप घडतात. एखादी मुलगी रस्त्याने जाताना दिसली की माणसे काही ना काही कमेंट करतातच. गावांमध्ये आजही मुली व त्यांचे कुटुंबीय अशा प्रकरणात भीती, प्रतिमा खराब हाेण्याची आणि कुणी लग्न करणार नाही या चिंतेने तक्रार दाखल करीत नाहीत. मात्र काळ बदलत असून लाेकांची मानसिकताही बदलत असल्याचे ते म्हणाले.

विनायक यांनी या यात्रेदरम्यान अनेक गावांना भेट दिली. विशिष्ट मार्ग ठरविला नाही पण यात्रेत गावाेगाव फिरून कारगीलला पाेहचणार असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे विनायक यांच्या यात्रेत केरळचे स्वतंत्र छायाचित्रकार शिव शिवा आणि आंध्रप्रदेशचे बशीर शेख हे दाेन व्यक्तीसुद्धा जुळले गेल्याचे त्यांनी सांगितले.

थोडा बदलही समाधानकारक

या पदयात्रेने समाजात खूप बदल घडेल असे नाही पण जाे थाेडा बदल घडेल ताे समाधानकारक ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या या विषयावर लाेक बाेलू लागतील, हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक