शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

बलात्कारमुक्त देशासाठी 'त्याची' कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 10:50 IST

बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी व देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून नाशिकच्या विनायक निंबाळकर या तरुण पत्रकाराने थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

ठळक मुद्देतरुण पत्रकाराची अशीही जनजागृती : दर दिवशी देशात अत्याचाराची ७७ प्रकरणे

अंकिता देशकर

नागपूर : भारताच्या नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युराेच्या नाेंदीनुसार २०२० साली देशात बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. म्हणजे दर दिवशी तब्बल ७७ बलात्कार. ही केवळ नाेंद झालेली प्रकरणे आहेत आणि खरा आकडा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. विनयभंगाच्या प्रकरणात अनेकदा तक्रारही केली जात नाही. देशातील या वास्तवाने अस्वस्थ झालेल्या एका तरुण पत्रकाराने देश बलात्कारमुक्त व्हावा, या इच्छेतून थेट कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा सुरू केली आहे.

नाशिक येथील रहिवासी विनायक निंबाळकर असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या यात्रेदरम्यान नागपूरला पाेहचलेल्या विनायक यांच्याशी लाेकमतने संवाद साधला. एक पत्रकार म्हणून नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय आहे. मात्र काेराेना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांतील बहुतेक मथळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे हाेते. त्यावेळी प्रचंड अस्वस्थ वाटत हाेते. त्यामुळे अशा प्रकाराविराेधात लाेकांना जागृत करण्यासाठी काहीतरी करावे, असा निर्धार केला. तेव्हा बलात्कार व स्त्रियांच्या छेडखानीविराेधात जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करावी, असा निर्धार केला.

सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे विनायक यांनी सांगितले. देशातील खेडे अद्यापही अंधारात असून महिलांचे स्थान समाजाच्या वंचित घटकांमध्येच माेडते आणि अशा प्रकरणात त्या कधी तक्रारही करीत नाहीत. महामार्गांवर विनयभंगाचे प्रकार खूप घडतात. एखादी मुलगी रस्त्याने जाताना दिसली की माणसे काही ना काही कमेंट करतातच. गावांमध्ये आजही मुली व त्यांचे कुटुंबीय अशा प्रकरणात भीती, प्रतिमा खराब हाेण्याची आणि कुणी लग्न करणार नाही या चिंतेने तक्रार दाखल करीत नाहीत. मात्र काळ बदलत असून लाेकांची मानसिकताही बदलत असल्याचे ते म्हणाले.

विनायक यांनी या यात्रेदरम्यान अनेक गावांना भेट दिली. विशिष्ट मार्ग ठरविला नाही पण यात्रेत गावाेगाव फिरून कारगीलला पाेहचणार असे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे विनायक यांच्या यात्रेत केरळचे स्वतंत्र छायाचित्रकार शिव शिवा आणि आंध्रप्रदेशचे बशीर शेख हे दाेन व्यक्तीसुद्धा जुळले गेल्याचे त्यांनी सांगितले.

थोडा बदलही समाधानकारक

या पदयात्रेने समाजात खूप बदल घडेल असे नाही पण जाे थाेडा बदल घडेल ताे समाधानकारक ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या या विषयावर लाेक बाेलू लागतील, हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक