शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 20:04 IST

Nagpur News बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो.

नागपूर : दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) आजार जनजागृतीमुळे वाढत आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो. भारत सरकारने ‘३० दिन रोशनी के’ या घोषवाक्यातून जन्मानंतर बाळाच्या डोळ्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

- काय आहे ‘आरओपी ’

मुदतपूर्व जन्मल्यामुळे किंवा कमी वजनाच्या बाळाच्या डोळ्यांच्या अंत:पटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला ‘आरओपी’ हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. यामुळे अंधत्व आल्यास त्यावर कोणताही उपचार करता येत नाही. योग्य वेळी तपासणी करून उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते.

- अकाली जन्मलेल्यांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण ३० टक्क्यांवर

वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी सांगितले, अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्के असते. त्यापैकी १५ ते २० टक्के बाळांना उपचारांची गरज असते.

- भारतात दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना अंधत्व

भारतात दरवर्षी २ लाख बालके अकाली (प्री-टर्म) जन्माला येतात. यापैकी ३० ते ४० हजार अर्भकांची तपासणी होते. जागरुकता आणि तपासणीच्या अभावामुळे दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना ‘आरओपी’मुळे अंधत्व येते.

- या बालकांनाही तपासणीची गरज

३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या किंवा दोन किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या सर्व बाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याशिवाय, ऑक्सिजनची कमी, रक्त संक्रमण, सेप्सिस (संसर्ग), श्वासोच्छवासाचा त्रास, जन्मानंतर कमी वजन वाढणे, अशा बाळांना देखील ‘आरओपी’चा धोका असतो.

- लक्षणे काय?

‘आरओपी’ या नेत्रविकारात लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बाह्य डोळा पूर्णपणे सामान्य दिसतो. त्यामुळे अनेक पालक तपासणी आणि उपचारांना नकार देतात. आजार बळावल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

- बालकांमध्ये अंधत्व आणणारा आजार

बालकांना ‘आरओपी’ होण्यापासून वाचविण्यासाठी वेळीच उपचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सरकारने ‘३० दिन रोशनी के’ ही मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचं निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करावी लागते. मूल एक महिन्याचे होण्याआधी ही तपासणी करून घेणे आवश्यक असते.

- डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य