शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 20:04 IST

Nagpur News बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो.

नागपूर : दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) आजार जनजागृतीमुळे वाढत आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो. भारत सरकारने ‘३० दिन रोशनी के’ या घोषवाक्यातून जन्मानंतर बाळाच्या डोळ्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

- काय आहे ‘आरओपी ’

मुदतपूर्व जन्मल्यामुळे किंवा कमी वजनाच्या बाळाच्या डोळ्यांच्या अंत:पटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला ‘आरओपी’ हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. यामुळे अंधत्व आल्यास त्यावर कोणताही उपचार करता येत नाही. योग्य वेळी तपासणी करून उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते.

- अकाली जन्मलेल्यांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण ३० टक्क्यांवर

वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी सांगितले, अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्के असते. त्यापैकी १५ ते २० टक्के बाळांना उपचारांची गरज असते.

- भारतात दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना अंधत्व

भारतात दरवर्षी २ लाख बालके अकाली (प्री-टर्म) जन्माला येतात. यापैकी ३० ते ४० हजार अर्भकांची तपासणी होते. जागरुकता आणि तपासणीच्या अभावामुळे दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना ‘आरओपी’मुळे अंधत्व येते.

- या बालकांनाही तपासणीची गरज

३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या किंवा दोन किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या सर्व बाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याशिवाय, ऑक्सिजनची कमी, रक्त संक्रमण, सेप्सिस (संसर्ग), श्वासोच्छवासाचा त्रास, जन्मानंतर कमी वजन वाढणे, अशा बाळांना देखील ‘आरओपी’चा धोका असतो.

- लक्षणे काय?

‘आरओपी’ या नेत्रविकारात लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बाह्य डोळा पूर्णपणे सामान्य दिसतो. त्यामुळे अनेक पालक तपासणी आणि उपचारांना नकार देतात. आजार बळावल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

- बालकांमध्ये अंधत्व आणणारा आजार

बालकांना ‘आरओपी’ होण्यापासून वाचविण्यासाठी वेळीच उपचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सरकारने ‘३० दिन रोशनी के’ ही मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचं निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करावी लागते. मूल एक महिन्याचे होण्याआधी ही तपासणी करून घेणे आवश्यक असते.

- डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य