शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

जन्मानंतर तीन आठवड्यात बाळाच्या डोळ्यांची तपासणी केली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 20:04 IST

Nagpur News बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो.

नागपूर : दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ (आरओपी) आजार जनजागृतीमुळे वाढत आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तीन ते चार आठवड्यात डोळ्यांची तपासणी करून उपचार घेतल्यास कायम अंधत्वाचा धोका टळू शकतो. भारत सरकारने ‘३० दिन रोशनी के’ या घोषवाक्यातून जन्मानंतर बाळाच्या डोळ्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

- काय आहे ‘आरओपी ’

मुदतपूर्व जन्मल्यामुळे किंवा कमी वजनाच्या बाळाच्या डोळ्यांच्या अंत:पटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला ‘आरओपी’ हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. यामुळे अंधत्व आल्यास त्यावर कोणताही उपचार करता येत नाही. योग्य वेळी तपासणी करून उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते.

- अकाली जन्मलेल्यांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण ३० टक्क्यांवर

वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी सांगितले, अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये ‘आरओपी’चे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्के असते. त्यापैकी १५ ते २० टक्के बाळांना उपचारांची गरज असते.

- भारतात दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना अंधत्व

भारतात दरवर्षी २ लाख बालके अकाली (प्री-टर्म) जन्माला येतात. यापैकी ३० ते ४० हजार अर्भकांची तपासणी होते. जागरुकता आणि तपासणीच्या अभावामुळे दरवर्षी सहा ते आठ हजार बालकांना ‘आरओपी’मुळे अंधत्व येते.

- या बालकांनाही तपासणीची गरज

३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या किंवा दोन किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या सर्व बाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याशिवाय, ऑक्सिजनची कमी, रक्त संक्रमण, सेप्सिस (संसर्ग), श्वासोच्छवासाचा त्रास, जन्मानंतर कमी वजन वाढणे, अशा बाळांना देखील ‘आरओपी’चा धोका असतो.

- लक्षणे काय?

‘आरओपी’ या नेत्रविकारात लक्षणे दिसून येत नाहीत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बाह्य डोळा पूर्णपणे सामान्य दिसतो. त्यामुळे अनेक पालक तपासणी आणि उपचारांना नकार देतात. आजार बळावल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

- बालकांमध्ये अंधत्व आणणारा आजार

बालकांना ‘आरओपी’ होण्यापासून वाचविण्यासाठी वेळीच उपचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सरकारने ‘३० दिन रोशनी के’ ही मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचं निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून करावी लागते. मूल एक महिन्याचे होण्याआधी ही तपासणी करून घेणे आवश्यक असते.

- डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य