शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांकडून होतो छळ; पीडित पुरुषांच्या वाढल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:56 IST

Nagpur News पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे.

ठळक मुद्दे स्वातंत्र्य संपल्याची तिची भावना झाल्याने पत्नी हेकडपणे वागते. त्याचमुळे ती टोमणे हाणते, अशी पुरुषांची भावना झाली असून, तसे अनेक पुरुषांच्या तक्रारीत नमूद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती कारणांवर होणारा महिलांचा छळ आणि तक्रारी, तसेच पुरुषांवर पोलिसांनी केलेली कारवाई हा नेहमीचाच भाग आहे. मात्र, पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे.

काेराेना काळात कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी असल्याने, कुटुंबातील संवादसुख वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, झाले उलटे. घरात पुरुष राहू लागल्याने, तो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. पत्नीला मोकळेपणाने इकडे-तिकडे जात येत नसल्याने, संशयकल्लोळ वाढला आहे. यातूनच अनेक कुटुंबांत संवादाएवेजी वाद वाढल्याचे वास्तव पुढे आले आहे.

२०२० मध्ये भरोसा सेलकडे एकूण १,४३८ तक्रारी आल्या होत्या, तर १ जानेवारी ते १३ जूनपर्यंत ७८७ तक्रारी भरोसा सेलकडे आलेल्या आहेत. त्यात पत्नीकडून छळ होत असलेल्या पुरुषांनी नोंदविलेल्या तक्रारींची संख्या गेल्या वर्षी १५२ होती, तर आता ६ महिन्यांत हा आकडा ८० वर पोहोचला आहे.

रिकामटेकडे ऑर्डर

काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांचे काम बंद झाल्यामुळे. बाहेर विनाकारण पडले, तर कारवाईचा धाक असल्याने घरात राहण्याशिवाय पर्याय नसल्याने घराघरात पुरुष मंडळी पडून राहू लागली. त्यामुळे त्याच्या मागण्याही वाढल्या. नुसता घरात पडून राहतो अन् ऑर्डर सोडतो, अशी भावना झाल्याने महिला पाणउतारा करतात.

हस्तक्षेप वाढल्याची भावना

वारंवार चहा मागतो, आज हे कर, उद्या ते कर, हे का केले नाही, ते का केले नाही. तू घर स्वच्छ ठेवत नाही. मुलांवर रागावते. आईला वेळेवर जेवण देत नाही. माझ्यासमोर असे आहे, तर मागे कसे राहत असेल, असे पुरुष मंडळीकडून टोमणे हाणले जात असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे. तू सारखी मोबाइलमध्येच गुंतून राहते, घराकडे अजिबात लक्ष देत नसल्याची कुरबुर नवरा करत असल्यामुळे आणि सारखा हस्तक्षेप करत असल्यामुळे पतीसोबत तोंड वाजत असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे.

पती-पत्नी विभक्त झाल्यास सर्वाधिक नुकसान मुलांचे होते. त्यांच्यावर भावनिक आघातही होतो. त्यामुळे कुणाचाही संसार तुटू नये, यासाठी आम्ही भरसक प्रयत्न करतो. मुलांच्या भविष्यावर होणारे परिणाम समोर ठेवून पती-पत्नीचे समुपदेशन करतो. त्यामुळे अनेक संसाराची विस्कटलेली घडी नीट करण्यात आम्ही यशस्वी होतो.

रेखा संकपाळ

सहायक पोलीस निरीक्षक भरोसा सेल प्रमूख, नागपूर.

---

टॅग्स :Policeपोलिस