शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'आरोपीला फाशी, पत्नीला नोकरी अन् मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 22:36 IST

Nagpur News महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.

ठळक मुद्देआरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणीमहाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ‘एसपीं’ना निवेदन

नागपूर : वेकोलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक ६ च्या चेक पोस्टजवळ रविवारी ११ डिसेंबरला झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, गोळीबारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.

रविवारी ११ डिसेंबरला आरोपी समीर सदरुल सिद्दीकी (३०, अष्टविनायक कॉलनी, टेकाडी ता. पारशिवनी) आणि राहुल जोसेफ जेकप (२६, कांद्री कन्हान, ता. पारशिवनी) यांनी गोळ्या झाडल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडे गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिलिंदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी मिलिंदचा मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे मिलिंदची पत्नी ग्रीष्माला नोकरी द्यावी, कर्तव्यावर असताना गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मिलिंदचा भाऊ प्रफुल्ल खोब्रागडे, प्रतिभा खोब्रागडे आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्माने केली आहे. मृत मिलिंदची पेट्रोलिंगची ड्युटी असताना त्याची चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात आली. तसेच चेकपोस्टवर चौघांची ड्युटी लावणे गरजेचे असताना एकाचीच ड्युटी का लावली ? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मिलिंदचा मृतदेह घेऊन अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रंभापूर या गावाकडे रवाना झाले.

 

निवेदनावर योग्य ती कारवाई करू

‘मृत जवान मिलिंद खोब्रागडेची पत्नी ग्रीष्माचे लेखी निवेदन आम्ही घेतले आहे. तिला नोकरीत सामावून घेण्याबाबत मुंबई मुख्यालयाच्या वतीने निर्णय घेण्यात येईल. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. ’

-दीपक देवराज, अधीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल

..........

टॅग्स :Socialसामाजिक