शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'आरोपीला फाशी, पत्नीला नोकरी अन् मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 22:36 IST

Nagpur News महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.

ठळक मुद्देआरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणीमहाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ‘एसपीं’ना निवेदन

नागपूर : वेकोलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक ६ च्या चेक पोस्टजवळ रविवारी ११ डिसेंबरला झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावेत, गोळीबारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्णाला नोकरी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधीक्षक दीपक देवराज यांना करण्यात आली.

रविवारी ११ डिसेंबरला आरोपी समीर सदरुल सिद्दीकी (३०, अष्टविनायक कॉलनी, टेकाडी ता. पारशिवनी) आणि राहुल जोसेफ जेकप (२६, कांद्री कन्हान, ता. पारशिवनी) यांनी गोळ्या झाडल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान मिलिंद खोब्रागडे गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिलिंदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी मिलिंदचा मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे मिलिंदची पत्नी ग्रीष्माला नोकरी द्यावी, कर्तव्यावर असताना गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मिलिंदवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मिलिंदचा भाऊ प्रफुल्ल खोब्रागडे, प्रतिभा खोब्रागडे आणि मिलिंदची पत्नी ग्रीष्माने केली आहे. मृत मिलिंदची पेट्रोलिंगची ड्युटी असताना त्याची चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात आली. तसेच चेकपोस्टवर चौघांची ड्युटी लावणे गरजेचे असताना एकाचीच ड्युटी का लावली ? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मिलिंदचा मृतदेह घेऊन अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रंभापूर या गावाकडे रवाना झाले.

 

निवेदनावर योग्य ती कारवाई करू

‘मृत जवान मिलिंद खोब्रागडेची पत्नी ग्रीष्माचे लेखी निवेदन आम्ही घेतले आहे. तिला नोकरीत सामावून घेण्याबाबत मुंबई मुख्यालयाच्या वतीने निर्णय घेण्यात येईल. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणे ही राज्य शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. ’

-दीपक देवराज, अधीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल

..........

टॅग्स :Socialसामाजिक