शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

संघातील 'त्या' हातामुळेच आज सलामासाठी उठतात हात; मुख्यमंत्र्यांचं RSSला श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:19 IST

संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो.

ठळक मुद्देसंघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो.संघासमोर नतमस्तक झालेल्या या हातांमुळेच चांगले संस्कार मिळालेहिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी ते संकुचित होतं तेव्हा ते हिंदुत्व राहत नाही.

नागपूरः संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो. घरासमोरच शाखा भरायची, संघासमोर नतमस्तक झालेल्या या हातांमुळेच चांगले संस्कार मिळाले आणि समाजासोबत जगायला शिकलो. त्याचाच फायदा जीवनात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. हिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी ते संकुचित होतं तेव्हा ते हिंदुत्व राहत नाही. चर्चमध्ये वा मस्जिदमध्ये गेलो तिथे मला माझा देवच दिसतो. मी लहानपणापासूनच हेच शिकलो. भारतीय जीवनपद्धतीला नाकारण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे हिंदुत्व जागृत करावं लागतं. जिथे जीवनपद्धतीला नाकारलं जात नाही, तिथं सहिष्णुतेनं इतर जीवन पद्धतींना सन्मानाने स्वीकारणं हे हिंदुत्व आहे.राजकारणात काम करत असताना समाजात काम करण्याची वृत्ती जागी झाली. त्यामुळेच हा जो हात आहे तो घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना मांडत असतो. परंतु सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र यंत्रणेकडून म्हणावी तशी गती मिळाली नाही. यंत्रणा साथ देत नव्हती. 2014च्या निवडणुकीतही मी एक व्हिजन डॉक्युमेंट केलं होतं. तसा एक कार्यक्रमदेखील मी केला होता. ते व्हिजन डॉक्युमेंट कसं सत्यात उतरवता येईल, याचाही मी विचार केलेला होता. त्यावेळेस मांडलेली गोष्ट पूर्ण केली आहे.

मागील 4 वर्षांत प्रशासनावरील पकड मजबूत झाली आणि त्रास सहन करण्याची क्षमतादेखील वाढली. नोकरशाहीतील 50 टक्के आरक्षण दिलं जातं. सरकारी नोकऱ्यांपेक्षा खासगी क्षेत्रात जास्त संधी आहेत. आरक्षण मिळाले तरी नोकऱ्यांत फारसा फायदा नाही. आरक्षणामुळे मनाचे समाधान होते. पुढील 5 ते 10 वर्षांत आरक्षणाचे महत्व व माहात्म्य कमी होईल. सामाजिक आरक्षण बाजूला सारून आर्थिक आरक्षणाकडे जाण्याची वेळ अद्याप आलेली नाही. सर्वच समाजात संकुचित मानसिकता वाढणे हा चिंतेचा विषय आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस