शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अर्ध्यावरती डाव मोडला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:38 IST

गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले.

ठळक मुद्देजखमी नर भोवरीला वाचविले ते दिसेनासे झाल्याने नागरिकांना हुरहूर

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले. ते दोघेही तेथे राहू लागले होते. आता ती लवकरच अंडीही घालणार होती. तिची अवस्था पाहून तो तिला बाहेर जाऊ देत नसे. सकाळ झाली की तो बाहेर पडायचा. चोचीत इवलासा चारा आणून तो तिला भरवायचा आणि मग स्वत:ही घ्यायचा. येणाऱ्या नव्या पाहुण्यांचे स्वप्न ते दोघेही पाहत असावेत कदाचित. सर्व सुखात चालले होते. गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला भोवरी या पक्ष्याच्या नर-मादीचा संसार घरमालक आशिष महल्ले हे लक्षपूर्वक पाहत होते.पण शनिवारी अचानक अनपेक्षित घडले. नेहमीप्रमाणे तो सकाळी घरट्यातून निघाला. अन्नाचा शोध घेत तो परिसरातल्या विजेच्या उंच खांबावर बसला. त्याला फक्त घरट्यात वाट पाहणाऱ्या मादीसाठी अन्न गोळा करण्याची आस लागली होती. येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ होता. पंख उघडून तो झेप घेणार तसाच त्याचा पाय खांबावर लागलेल्या पतंगाच्या मांजात अडकला. सुटण्याची धडपड व पंखांची फडफडही व्यर्थ गेली. उलट या धडपडीत धाग्याने त्याचा पाय व पंख चिरला गेला. हे दृश्य पाहून आशिष यांनी लगेच महावितरणच्या कार्यालयात फोन केला. महावितरणचे पथक तेथे दाखल झाले. त्यांनीही संवेदनशीलता दाखवीत खांबावर चढून या पक्ष्याला जीवघेण्या मांजाच्या गुंत्यातून बाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता. आसपासच्या संवेदनशील नागरिकांनी त्याला पाणीही पाजले व घराच्या गॅलरीजवळ ठेवले.या अपघातानंतर तो जखमांमुळे तडफडत होता, पण आपल्या मादीजवळ जाऊ शकत नव्हता. ती मात्र तो येण्याची सकाळपासून रात्रीपर्यंत घरट्यातच वाट पाहत होती. काहीतरी अघटित घडल्याची चाहूल तिला लागली असावी किंवा भूकही लागली असावी.म्हणूनच की काय ती या अवस्थेतही त्याच्या शोधात रविवारी घरट्याबाहेर पडली. त्यानंतर दिवसभर ती घरट्यात परतली नाही. तोही ठेवलेल्या जागेवर नव्हता. त्यामुळे ते पुन्हा घरट्यात परततील की नाही? की त्यांचा संसार अर्ध्यावरती मोडला तर नसेल ना, ही हुरहुर आसपासच्या लोकांना लागली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक