शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

अर्ध्यावरती डाव मोडला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:38 IST

गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले.

ठळक मुद्देजखमी नर भोवरीला वाचविले ते दिसेनासे झाल्याने नागरिकांना हुरहूर

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले. ते दोघेही तेथे राहू लागले होते. आता ती लवकरच अंडीही घालणार होती. तिची अवस्था पाहून तो तिला बाहेर जाऊ देत नसे. सकाळ झाली की तो बाहेर पडायचा. चोचीत इवलासा चारा आणून तो तिला भरवायचा आणि मग स्वत:ही घ्यायचा. येणाऱ्या नव्या पाहुण्यांचे स्वप्न ते दोघेही पाहत असावेत कदाचित. सर्व सुखात चालले होते. गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला भोवरी या पक्ष्याच्या नर-मादीचा संसार घरमालक आशिष महल्ले हे लक्षपूर्वक पाहत होते.पण शनिवारी अचानक अनपेक्षित घडले. नेहमीप्रमाणे तो सकाळी घरट्यातून निघाला. अन्नाचा शोध घेत तो परिसरातल्या विजेच्या उंच खांबावर बसला. त्याला फक्त घरट्यात वाट पाहणाऱ्या मादीसाठी अन्न गोळा करण्याची आस लागली होती. येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ होता. पंख उघडून तो झेप घेणार तसाच त्याचा पाय खांबावर लागलेल्या पतंगाच्या मांजात अडकला. सुटण्याची धडपड व पंखांची फडफडही व्यर्थ गेली. उलट या धडपडीत धाग्याने त्याचा पाय व पंख चिरला गेला. हे दृश्य पाहून आशिष यांनी लगेच महावितरणच्या कार्यालयात फोन केला. महावितरणचे पथक तेथे दाखल झाले. त्यांनीही संवेदनशीलता दाखवीत खांबावर चढून या पक्ष्याला जीवघेण्या मांजाच्या गुंत्यातून बाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता. आसपासच्या संवेदनशील नागरिकांनी त्याला पाणीही पाजले व घराच्या गॅलरीजवळ ठेवले.या अपघातानंतर तो जखमांमुळे तडफडत होता, पण आपल्या मादीजवळ जाऊ शकत नव्हता. ती मात्र तो येण्याची सकाळपासून रात्रीपर्यंत घरट्यातच वाट पाहत होती. काहीतरी अघटित घडल्याची चाहूल तिला लागली असावी किंवा भूकही लागली असावी.म्हणूनच की काय ती या अवस्थेतही त्याच्या शोधात रविवारी घरट्याबाहेर पडली. त्यानंतर दिवसभर ती घरट्यात परतली नाही. तोही ठेवलेल्या जागेवर नव्हता. त्यामुळे ते पुन्हा घरट्यात परततील की नाही? की त्यांचा संसार अर्ध्यावरती मोडला तर नसेल ना, ही हुरहुर आसपासच्या लोकांना लागली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक