शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

नागपूर मनपात अर्धी पदे रिक्त : कामकाजावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:14 IST

नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ४० टक्के पदे रिक्त असून, सफाई कर्मचारी गृहित धरले तर ही संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

ठळक मुद्देसफाई कर्मचाऱ्यांची साडेचार हजारांहून अधिक पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ४० टक्के पदे रिक्त असून, सफाई कर्मचारी गृहित धरले तर ही संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. नवीन पदांची भरती बंद आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.मनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ मंजूर पदे आहेत. यापैकी ७ हजार ९५० पदे भरली असून, तब्बल ४ हजार ११८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३४.४३ इतकी आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०३ पदे रिक्त आहेत, तर वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार १६ पदे रिक्त आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची ४ हजार ७२१ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे भरली जात नाही. यामुळे मनपात कंत्राट पद्धतीने कामे देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. यामुळे अनियमितता झाल्यास जबाबदारी कुणावर निश्चित करणार, असा प्रश्न आहे. शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कंत्राटदाराला दिले होते. नियमानुसार सर्वेक्षण झाले नाही. मालमत्ताधारकांना माहिती नसताना फेरमूल्यांकन करण्यात आले. घरटॅक्स मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा टॅक्स वसुलीवर परिणाम झाला.सहा वर्षांत दोन हजार निवृत्त१ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत मनपातून दोन हजार कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाले, तर २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर त्यांच्या वारसदारांना अटी व शर्तींच्या अधीन राहून संधी देण्यात आली. परंतु सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर नवीन भरती झाली नाही. पुढील दोन-तीन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.कंत्राट पद्धतीत कमी वेतनकाही जागांवर तर परत सेवानिवृत्तांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्यात आले. यातील एकालाही ५० हजारांहून जास्त वेतन नाही. मनपाचा आस्थापना खर्च जास्त असल्याने ४५ टक्क्याहून अधिक आहे. तो ३५ टक्केपर्यंत येत नाही, तोपर्यंत नवीन नोकर भरती नाही. नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राट पद्धतीत कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिले जाते. परंतु जबाबदारी निश्चित नाही. अशा परिस्थितीत अनियमितता झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.अग्निशमनमध्ये ८० टक्के पदे रिक्तशहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा विभाग समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८०टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पुढील सहा महिन्यात सहा अधिकारी निवृत्त होत आहेत. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी