शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या तासाच्या पावसाने नागपूरला धुतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:08 IST

अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास जोराचा पाऊस झाल्याने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अर्ध्या तासाच्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले. साचलेले पाणी काढण्यासाठी मनपाच्या अग्निशमन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले.

नंदनवन कॉलनी, राजेंद्रनगर चौक, दर्शन कॉलनी, बालाजीनगर, शास्त्रीनगर, हिवरी ले -आऊट आदी वस्त्यात पाणी साचले होते. सिमेंट रोडचे अर्धवट काम असलेल्या अयोध्यानगर येथील गजानन शाळेजवळ पाणी तुंबले होते. एलआयसी चौक, भांडे प्लॉट, सदर कॉलनी, चिटणवीसनगर, टेलिकॉमनगर, मेडिकल चौक, शंकरनगर चौक, जगनाडे चौक यांसह शहरातील अनेक वस्त्या, रस्ते व चौकात पाणी साचले होते. जरीपटका, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर पाणी तुंबले होते. सदर येथील कॉफी हाऊस व दूध डेअरीजवळ झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेले पाणी कमी झाले. मनपा प्रशासनाने शहरातील पावसाळी नाल्या, गडरलाईन व त्यातील नाले स्वच्छ केल्याचा दावा केला आहे. परंतु दोन दिवसाच्या पावसात पावसाळी नाल्या स्वच्छ झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नाल्याच्या पुराचे पाणी तुंबल्याने राजेंद्रनगर, नंदनवन परिसरात पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर साचलेले पाणी निघून गेले. काही ठिकाणी पावसाळी नाल्यात कचरा व गाळ साचून असल्याने तर कुठे सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले.१४.२ मिमी पावसाची नोंदसलग दुसऱ्या दिवशी उपराजधानीत मान्सून जोरदार बरसला. दुपारी पाऊण तासात पावसाचा जोर जास्त होता. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय आर्द्रतेतदेखील वाढ झाली. सकाळी ८.३० वाजता ९५ टक्के तर सायंकाळी ९६ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. बंगालच्या उपसागरात कमी दबावाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर विदर्भासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान, शहरात रविवारच्या तुलनेत जास्त थंडावा होता. कमाल तापमानात २.८ अंश सेल्सिअसची घट झाली व ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके होते.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर