शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:55 IST

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.सायंकाळी पावसाला सुरुवात होताच एक-एक फिडर बंद पडू लाले. महावितरणच्या काँग्रेस नगर डिव्हीजनमधील नरेंद्रगर, रिंग रोडसह एसएनडीएलचे बहुतांश भाग अंधारात डुबले होते. तुकडोजी पुतळा, मानेवाडा, रेशीमबाग गणेशनर, बगडगंज, आयुर्वेदिक ले-आऊट, उमरेड रोड, पारडी, वाठोडा, उप्पलवाडी, एस.टी. स्टँड, गांधीबग, गोरेवाडा, बोरगाव, ओंकारनगर, बेसा, जाफरनगर, केटीनगर, हरीहर मंदिर, मॉडेल मिल, अनमोलनगर, क्लॉर्क टाऊन आदी परिसर अंधरात होते. दक्षिण नागपूर तर पूर्णत:च अंधारात होते. अनेक तासांपासून वीज नसल्याने नागरिकही संतापले होते. या संतापाचा भडका वितरण कंपनीच्या अनेक कार्यालयाबाहेर दिसून आला. मानेवाडा चौकातील कार्यालयाबाहेर नागरिक एकत्र आले होते. पोलिसांना बोलवावे लागले होते. वीज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त न झाल्यास रविवारी संतप्त नागरिकांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज ग्राहकांनी संयम राखवाशहर व जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंते प्रयत्न करीत आहे. पावसाचा जोर कमी होताच युद्धस्तरार काम करीत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अजूनही ते केले जात आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.... तर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीपावसाळ्यात वीज जाऊ नये यासाठी मान्सूनपूर्व तयारी करून घ्यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात धोकादायक वृक्षांची कटाई, छाटणी आदी कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आजची परिस्थिती पाहता ती कामे झालीच नसल्याचे दिसून येते. आमदारांनी निर्देश देऊनही कामे होत नाही हे गंभीर आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण नागपूर अंधारात होते. ठिकठिकाणी झाडे पडल्यान विजेच्या तारा तुटल्या होत्या. नागरिक संतप्त . सातत्याने फोनवर फोन येत होते. तब्बल ५२ फिडर बंद पडल्याचे सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वीच असे हाल असतील तर पावसाळ्यात काय होणार? तातडीने वीज पुरवठा झाला नाही. आणि यंत्रणा सुधारली ही, तर कुणालाही सोडणार नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील.आ. सुधाकर कोहळेदक्षिण नागपूर

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर