शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:55 IST

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.सायंकाळी पावसाला सुरुवात होताच एक-एक फिडर बंद पडू लाले. महावितरणच्या काँग्रेस नगर डिव्हीजनमधील नरेंद्रगर, रिंग रोडसह एसएनडीएलचे बहुतांश भाग अंधारात डुबले होते. तुकडोजी पुतळा, मानेवाडा, रेशीमबाग गणेशनर, बगडगंज, आयुर्वेदिक ले-आऊट, उमरेड रोड, पारडी, वाठोडा, उप्पलवाडी, एस.टी. स्टँड, गांधीबग, गोरेवाडा, बोरगाव, ओंकारनगर, बेसा, जाफरनगर, केटीनगर, हरीहर मंदिर, मॉडेल मिल, अनमोलनगर, क्लॉर्क टाऊन आदी परिसर अंधरात होते. दक्षिण नागपूर तर पूर्णत:च अंधारात होते. अनेक तासांपासून वीज नसल्याने नागरिकही संतापले होते. या संतापाचा भडका वितरण कंपनीच्या अनेक कार्यालयाबाहेर दिसून आला. मानेवाडा चौकातील कार्यालयाबाहेर नागरिक एकत्र आले होते. पोलिसांना बोलवावे लागले होते. वीज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त न झाल्यास रविवारी संतप्त नागरिकांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज ग्राहकांनी संयम राखवाशहर व जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंते प्रयत्न करीत आहे. पावसाचा जोर कमी होताच युद्धस्तरार काम करीत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अजूनही ते केले जात आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.... तर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीपावसाळ्यात वीज जाऊ नये यासाठी मान्सूनपूर्व तयारी करून घ्यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात धोकादायक वृक्षांची कटाई, छाटणी आदी कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आजची परिस्थिती पाहता ती कामे झालीच नसल्याचे दिसून येते. आमदारांनी निर्देश देऊनही कामे होत नाही हे गंभीर आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण नागपूर अंधारात होते. ठिकठिकाणी झाडे पडल्यान विजेच्या तारा तुटल्या होत्या. नागरिक संतप्त . सातत्याने फोनवर फोन येत होते. तब्बल ५२ फिडर बंद पडल्याचे सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वीच असे हाल असतील तर पावसाळ्यात काय होणार? तातडीने वीज पुरवठा झाला नाही. आणि यंत्रणा सुधारली ही, तर कुणालाही सोडणार नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील.आ. सुधाकर कोहळेदक्षिण नागपूर

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर