शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:55 IST

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.सायंकाळी पावसाला सुरुवात होताच एक-एक फिडर बंद पडू लाले. महावितरणच्या काँग्रेस नगर डिव्हीजनमधील नरेंद्रगर, रिंग रोडसह एसएनडीएलचे बहुतांश भाग अंधारात डुबले होते. तुकडोजी पुतळा, मानेवाडा, रेशीमबाग गणेशनर, बगडगंज, आयुर्वेदिक ले-आऊट, उमरेड रोड, पारडी, वाठोडा, उप्पलवाडी, एस.टी. स्टँड, गांधीबग, गोरेवाडा, बोरगाव, ओंकारनगर, बेसा, जाफरनगर, केटीनगर, हरीहर मंदिर, मॉडेल मिल, अनमोलनगर, क्लॉर्क टाऊन आदी परिसर अंधरात होते. दक्षिण नागपूर तर पूर्णत:च अंधारात होते. अनेक तासांपासून वीज नसल्याने नागरिकही संतापले होते. या संतापाचा भडका वितरण कंपनीच्या अनेक कार्यालयाबाहेर दिसून आला. मानेवाडा चौकातील कार्यालयाबाहेर नागरिक एकत्र आले होते. पोलिसांना बोलवावे लागले होते. वीज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त न झाल्यास रविवारी संतप्त नागरिकांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज ग्राहकांनी संयम राखवाशहर व जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंते प्रयत्न करीत आहे. पावसाचा जोर कमी होताच युद्धस्तरार काम करीत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अजूनही ते केले जात आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.... तर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीपावसाळ्यात वीज जाऊ नये यासाठी मान्सूनपूर्व तयारी करून घ्यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात धोकादायक वृक्षांची कटाई, छाटणी आदी कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आजची परिस्थिती पाहता ती कामे झालीच नसल्याचे दिसून येते. आमदारांनी निर्देश देऊनही कामे होत नाही हे गंभीर आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण नागपूर अंधारात होते. ठिकठिकाणी झाडे पडल्यान विजेच्या तारा तुटल्या होत्या. नागरिक संतप्त . सातत्याने फोनवर फोन येत होते. तब्बल ५२ फिडर बंद पडल्याचे सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वीच असे हाल असतील तर पावसाळ्यात काय होणार? तातडीने वीज पुरवठा झाला नाही. आणि यंत्रणा सुधारली ही, तर कुणालाही सोडणार नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील.आ. सुधाकर कोहळेदक्षिण नागपूर

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर