शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विदर्भासह महाराष्ट्रात गारपीट; अतिवृष्टीचा इशारा; नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:05 IST

Nagpur News भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ व १७ मार्च राेजी नागपूरसह चंद्रपूर व गडचिराेली या जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात १६ मार्च आणि भंडारा व गाेंदियात १७ मार्च राेजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे १४ मार्च राेजी सायंकाळच्या दरम्यान नागपुरात पावसाने हजेरी लावली. सलग पडला नसला तरी ठिकठिकाणी पावसाचे थेंब पडले. १२ तासात ०.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे रात्रीचा पारा काही अंशी घटला. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. बुधवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असले तरी दिवसाचे तापमान स्थिर हाेते. मात्र पुढचे दाेन दिवस पावसामुळे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पावसाळी स्थिती त्यापुढे दाेन दिवस राहणार असून १९ मार्चपर्यंत विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४० टक्के असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करीत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने बंगालच्या उपसागराहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या मिलाफ क्रियेतून घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

शेतीला नुकसान, टिनाच्या घरांनी सावध

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची काळजी घ्यावी.

- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त

टॅग्स :weatherहवामान