शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

विदर्भासह महाराष्ट्रात गारपीट; अतिवृष्टीचा इशारा; नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:05 IST

Nagpur News भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ व १७ मार्च राेजी नागपूरसह चंद्रपूर व गडचिराेली या जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात १६ मार्च आणि भंडारा व गाेंदियात १७ मार्च राेजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे १४ मार्च राेजी सायंकाळच्या दरम्यान नागपुरात पावसाने हजेरी लावली. सलग पडला नसला तरी ठिकठिकाणी पावसाचे थेंब पडले. १२ तासात ०.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे रात्रीचा पारा काही अंशी घटला. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. बुधवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असले तरी दिवसाचे तापमान स्थिर हाेते. मात्र पुढचे दाेन दिवस पावसामुळे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पावसाळी स्थिती त्यापुढे दाेन दिवस राहणार असून १९ मार्चपर्यंत विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४० टक्के असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करीत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने बंगालच्या उपसागराहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या मिलाफ क्रियेतून घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

शेतीला नुकसान, टिनाच्या घरांनी सावध

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची काळजी घ्यावी.

- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त

टॅग्स :weatherहवामान