शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासह महाराष्ट्रात गारपीट; अतिवृष्टीचा इशारा; नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:05 IST

Nagpur News भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ व १७ मार्च राेजी नागपूरसह चंद्रपूर व गडचिराेली या जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात १६ मार्च आणि भंडारा व गाेंदियात १७ मार्च राेजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे १४ मार्च राेजी सायंकाळच्या दरम्यान नागपुरात पावसाने हजेरी लावली. सलग पडला नसला तरी ठिकठिकाणी पावसाचे थेंब पडले. १२ तासात ०.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे रात्रीचा पारा काही अंशी घटला. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. बुधवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असले तरी दिवसाचे तापमान स्थिर हाेते. मात्र पुढचे दाेन दिवस पावसामुळे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पावसाळी स्थिती त्यापुढे दाेन दिवस राहणार असून १९ मार्चपर्यंत विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४० टक्के असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करीत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने बंगालच्या उपसागराहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या मिलाफ क्रियेतून घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

शेतीला नुकसान, टिनाच्या घरांनी सावध

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची काळजी घ्यावी.

- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त

टॅग्स :weatherहवामान