शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

विदर्भासह महाराष्ट्रात गारपीट; अतिवृष्टीचा इशारा; नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:05 IST

Nagpur News भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ व १७ मार्च राेजी नागपूरसह चंद्रपूर व गडचिराेली या जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात १६ मार्च आणि भंडारा व गाेंदियात १७ मार्च राेजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे १४ मार्च राेजी सायंकाळच्या दरम्यान नागपुरात पावसाने हजेरी लावली. सलग पडला नसला तरी ठिकठिकाणी पावसाचे थेंब पडले. १२ तासात ०.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे रात्रीचा पारा काही अंशी घटला. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. बुधवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असले तरी दिवसाचे तापमान स्थिर हाेते. मात्र पुढचे दाेन दिवस पावसामुळे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पावसाळी स्थिती त्यापुढे दाेन दिवस राहणार असून १९ मार्चपर्यंत विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४० टक्के असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करीत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने बंगालच्या उपसागराहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या मिलाफ क्रियेतून घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.

शेतीला नुकसान, टिनाच्या घरांनी सावध

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची काळजी घ्यावी.

- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त

टॅग्स :weatherहवामान