शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

गुरूपौर्णिमा विशेष; तरुणाईच्या ध्येयातून साकारले वंचित मुलांचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:22 IST

आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे.

ठळक मुद्देविवंचनेतून भरारी घेतलेल्या उच्चशिक्षितांचा छंद देतोय अनेकांच्या आयुष्याला दिशाविविध सामाजिक उपक्रमातही योगदान

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टी किंवा गरीब वस्त्यातील मुलेही हुशार असतात पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. हा आधार आहे या वस्तीत शिकविणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांचा. गुरू आपल्या मार्गातील अडचणी दूर करतो व दिशा दाखवितो. हे तरुणही गरीब मुलांसाठी शिक्षणाच्या मार्गाने लावणारे दिशादर्शक झाले आहेत.सुनील जवादे, धर्मपाल धाबर्डे, राजू गायकवाड, अभिनव मेंढे, शुभम ढेंगरे, प्रशिक वाहाने, ऋषभ जवादे, साहिल धाबर्डे ही आहेत गरीब मुलांच्या गुरुस्थानी असलेले तरुण. रामबागसारख्या गरीब व मागासलेल्या वस्तीत ते वाढले. स्वत:च्या मेहनतीने शिकले. उच्च विद्याविभूषित झाले. एखादा नोकरीवर लागला तर इतर अजूनही शिक्षण घेत नोकरीच्या शोधात आहेत. समोर उज्ज्वल भविष्य असून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने या तरुणांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याचा निर्णय घेतला. कदाचित याच विवंचना असलेल्या परिस्थितीतूनच ते गेले आहेत. त्यातील राजू गायकवाड हे जीएसटी अधिकारी आहेत. अभिनव मेंढे मेकॅनिकल इंजिनियर, शुभम ढेंगरे हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. साहिल धाबर्डे व ऋषभ हा डिप्लोमा इन फायर इंजिनियर आहेत. रामबाग परिसरात तथागत बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.२०१५ सालची ही गोष्ट. रामबाग हा परिसर तसा गरीब, कामगार कष्टकऱ्यांचा परिसर. बहुतांश विद्यार्थी हे हुशार परंतु शिकवणी नसल्याने स्पर्धेत माघारतात. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासात मागे राहतात. असे अनेक अनुभव या तरुणांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे किमान आपण चांगले शिकलो तेव्हा इतर गरीब विद्यार्थ्यांंची शिकवणी घ्यायची असा निर्णय या तरुणांनी घेतला. सर्वांना ही कल्पना आवडली. यासाठी एक बॅनर तयार करण्यात आला. तथागत अभ्यासिका असे नाव देण्यात आले. या तरुणांनी संपूर्ण वस्तीत फिरून असे गरजू विद्यार्थी शोधले. त्यांच्या पालकांना सांगितले. तेही तयार झाले.तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातच अभ्यासिका सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु हळूहळू ती वाढली. परिसरातील लोकांचाही विश्वास वाढला. आज ५ वी पासून १२ वीपर्यंतचे अनेक गरीब विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. अभिनव, साहिल, शुभम आणि ऋषभ हे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. गेल्या वर्षी दहावीत अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या ध्येयशील तरुणांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनाही शिकण्याची एक ओढ लागली असून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश प्राप्त केले आहे. चांगल्या विचारांनी, संस्काराने समाज घडविणारे गुरुच तर असतात. हे उच्चशिक्षित तरुण त्यापेक्षा काही वेगळे नव्हेत.

शिकवणीमुळे लागली शाळेची ओढया तरुणांनी सुरू केलेला हा एक छोटाचा प्रयत्न आहे. यातून दहावी-बारावीमध्ये विद्यार्थी एकदम चांगले गुण मिळवू लागले असेही नाही. परंतु या लहानशा पुढाकाराने एक खूप मोठे काम झाले आहे. कदाचित ही मुले शिक्षण सोडून वेगळ्या मार्गाला लागली असती. पण तरुणांच्या शिकवणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेची ओढ लागली. ते शाळेत जाऊ लागले. नियमित अभ्यास करू लागले. शिकून जीवनात काहीतरी बनू असे स्वप्न पाहू लागले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGuru Purnimaगुरु पौर्णिमा