शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:32 IST

‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशांनुसार खासगी कंपनीशी करार : खरोखरच दर्जा वाढणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातीलविद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१६ सालच्या ‘एनआयआरएफ’च्या पहिल्या १०० ‘रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होता. तर २०१७ व २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता एकाही सार्वजनिक विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश नव्हता.राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने ‘आय केअर’ या एका खासगी ‘कन्सलटन्सी’ला नियुक्त केले आहे. राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व १०० महाविद्यालयांसमवेत या ‘कन्सलटन्सी’चा सामंजस्य करार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार विविध विद्यापीठांना संबंधित प्राधिकरणांमध्ये मान्यता घेण्यास सांगण्यात आले होते.यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला व सामंजस्य करार करण्याच्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.खरोखर किती फायदा होणार ?या ‘कन्सलटन्सी’ने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान येथील विद्यापीठांसाठी काम केले आहे. आता राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीयसोबतच आंतरराष्ट्रीय ‘रँकिंग‘ वाढविण्यासाठी या ‘कन्सलटन्सी’कडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांचादेखील या ‘कन्सलटन्सी’सोबत करार होणार आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांचा एकूण पसारा पाहता एखाद्या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनाने खरोखरच काही कालावधीतच बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्र