शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:32 IST

‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशांनुसार खासगी कंपनीशी करार : खरोखरच दर्जा वाढणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातीलविद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१६ सालच्या ‘एनआयआरएफ’च्या पहिल्या १०० ‘रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होता. तर २०१७ व २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता एकाही सार्वजनिक विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश नव्हता.राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने ‘आय केअर’ या एका खासगी ‘कन्सलटन्सी’ला नियुक्त केले आहे. राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व १०० महाविद्यालयांसमवेत या ‘कन्सलटन्सी’चा सामंजस्य करार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार विविध विद्यापीठांना संबंधित प्राधिकरणांमध्ये मान्यता घेण्यास सांगण्यात आले होते.यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला व सामंजस्य करार करण्याच्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.खरोखर किती फायदा होणार ?या ‘कन्सलटन्सी’ने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान येथील विद्यापीठांसाठी काम केले आहे. आता राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीयसोबतच आंतरराष्ट्रीय ‘रँकिंग‘ वाढविण्यासाठी या ‘कन्सलटन्सी’कडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांचादेखील या ‘कन्सलटन्सी’सोबत करार होणार आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांचा एकूण पसारा पाहता एखाद्या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनाने खरोखरच काही कालावधीतच बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्र