शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: November 11, 2015 02:25 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. परंतु पाणीटंचाई संदर्भात कोणतेही रेकॉर्ड नव्हते.

ग्रामीण पाणीटंचाई बैठक : मंजुरी असतानाही १६० कामे प्रलंबितनागपूर : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. परंतु पाणीटंचाई संदर्भात कोणतेही रेकॉर्ड नव्हते. उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नव्हती. जबाबदारी झटकून टाकणारी उत्तरे प्रशासनाकडून आल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून नाराजी व्यक्त केली. बैठकीला आमदार समीर मेघे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील टंचाईची सर्व कामे पूर्ण करा. २६ नोव्हेंबरच्या बैठकीत टंचाई आराखडा भाग २ तयार करून सोबत आणा, अशा सूचना देण्यात आल्या. ग्रामसेवकांकडे पाण्याच्या नमुन्यांचे रजिस्टर नाही. विंधन विहिरी व सद्यस्थितीची माहिती नाही. ते दररोज सहा तासही काम करीत नाही, अशा तक्रारी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केल्या. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. खंडविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी आपली जबाबदारी नाही, अशी उत्तरे देऊ न वातावरण तापविण्यास मदत केली. उपविभागीय अधिकारी ग्रामीण भागाचे दौरे करीत नाही. त्यांना पाणीटंचाईची माहिती नाही. शासनाने आणि जिल्हा परिषदेने मंजूर केलेली कामे झालेली नाही. जिल्ह्यात १६० कामे मंजूर असूनही प्रलंबित आहे. पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जाते. असे असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे ग्रामसेवकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संतापून पालकमंत्र्यांनी बैठक अर्धवट अवस्थेत थांबवली. पूरग्रस्तांचे पैसे, नाल्यावरील अतिक्रमण, रस्त्यांची स्थिती यापैकी एकही जबाबदारी आपली नसल्याचे त्यांनी सांगितले. बेजबाबदारपणा दिसून आला. बैठकीला तलाठी व तहसीलदारांना निमंत्रित केले नव्हते, यावर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. २०१६ या वर्षाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी व तहसीलदार यांनी गावांचा दौरा करून २६ नोव्हेंबरच्या बैठकीत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.(प्रतिनिधी)