शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत १.५८ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:04 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील भूजल पातळी सुधारली५ वर्षातील सर्वाधिक वाढ

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूवैज्ञानिक विभागाकडून करण्यात आलेल्या निरीक्षणात जिल्ह्यात भूजलाची पातळी १.५८ मीटरने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढल्याची आकडेवारी विभागाने प्रसिद्ध केली आहे.

गतवर्षी जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे जलस्रोतही आटले होते. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली व त्यामुळे जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे भूजलामध्येही पाणी मुरले. यंदा उन्हाळा फार तपला नाही आणि मान्सूनपूर्व पावसानेही लवकरच हजेरी लावली.

सोबतच संपूर्ण उन्हाळा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा उपसा म्हणावा तेवढा नव्हता. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा मे महिन्यातील पाणी पातळी गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या ८.०४ मीटर इतकी होती.

टॅग्स :Waterपाणी