शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत १.५८ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:04 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील भूजल पातळी सुधारली५ वर्षातील सर्वाधिक वाढ

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूवैज्ञानिक विभागाकडून करण्यात आलेल्या निरीक्षणात जिल्ह्यात भूजलाची पातळी १.५८ मीटरने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा भूजल पातळी वाढल्याची आकडेवारी विभागाने प्रसिद्ध केली आहे.

गतवर्षी जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे जलस्रोतही आटले होते. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली व त्यामुळे जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे भूजलामध्येही पाणी मुरले. यंदा उन्हाळा फार तपला नाही आणि मान्सूनपूर्व पावसानेही लवकरच हजेरी लावली.

सोबतच संपूर्ण उन्हाळा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे सर्वाधिक पाण्याची गरज भासणाऱ्या औद्योगिक वसाहतीही बंद होत्या. यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा उपसा म्हणावा तेवढा नव्हता. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा मे महिन्यातील पाणी पातळी गेल्या पाच वर्षांतील सरासरीच्या ८.०४ मीटर इतकी होती.

टॅग्स :Waterपाणी