शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

सूर्याच्या नाही, ‘एलईडी’च्या झगमगाटात पिकेल शेती!

By जितेंद्र ढवळे | Published: September 04, 2023 3:37 PM

ग्रीन हाउस आशेचा किरण : विद्यापीठ कॅम्पस अन् समुद्रपूरमध्ये होतोय प्रयोग

जितेंद्र ढवळे 

नागपूर : सूर्यदेवाचा अभ्यास करायला भारताचे आदित्य एल-१ यान निघाले आहे! मात्र सूर्याचे अवंलबित्व कमी करून एलईडी लाइटच्या बळावर शेती करता येईल का? यातून दर्जेदार उत्पादन घेता येईल का, यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आणि समुद्रपूर येथील विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये संशोधन सुरू आहे. 

‘एलईडी बेस्ड ग्रीन हाउस फॉर प्लांट कल्टिव्हेशन’ असे या संकल्पनेचे नाव आहे. एलईडी बेस ग्रीन हाउस ही संकल्पना जगासाठी नवी नाही! मात्र विदर्भात याचा वापर व्हावा. दुष्काळ आणि नापिकीच्या झळा सोसणारा येथील शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून अत्यंत कमी खर्चात एलईडी बेस्ड ग्रीन हाउस तयार करून शेती करता येईल का, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोबळे आणि समुद्रपूरच्या विद्या विकास आर्ट ॲण्ड सायन्स कॉलेजच्या बॉटनी विभागाच्या प्रमुख डॉ. नयना शिरभाते गेल्या काही दिवसांपासून यावर संशोधन करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता यशही आले आहे. 

ग्रीन हाउस म्हणजे काय?

- ग्रीन हाउस शेतीत आपण हंगामी पिकांसोबत बिगरहंगामी पिके घेऊ शकतो. हे वर्षभर पिकाची वाढ आणि फळांचे उत्पादन समृद्ध करण्यास मदत करते.- हे पिकांचे संरक्षण करण्यास आणि त्यांना कीड तसेच रोगांपासून मुक्त ठेवण्यास आणि वाढ कायम ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे या शेतीसाठी पाणी कमी लागते.

यात एलईडीचा वापर कसा होणार?

- एलईडी ग्रोथ लाइट्स रोपांना ग्रीन हाउसमध्ये सूर्यप्रकाशाचे अनुकरण प्रदान करतात. हे दिवे विशिष्ट प्रकाश स्पेक्ट्रम (विशेषत: लाल आणि निळे) उत्सर्जित करतात जे वनस्पतींच्या वाढीवर परिणाम करतात. - एलईडी हा ग्रीन हाउससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो वनस्पतींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापक कस्टमायझेशन ऑफर करतो. कमी उष्णता उत्सर्जित करतो. 

कोणता रंग काय करतो?

ब्लू एलईडी (निळा रंग): ब्लू एलईडी हा झाडांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतो. रेड एलईडी (लाल रंग) : रेड एलईडीमुळे रोपांची वाढ होते. फार रेड एलईडी : फार रेड एलईडीमुळे झाडांना फळ धारणा होण्यास मदत होते.

एलईडी बेस्ड ग्रीन हाउसमध्ये औषधी वनस्पतीचे (मेडिकल प्लांट) संगोपन सहज शक्य आहे. इतकेच काय ज्या पिकांचे किंवा फळांचे उत्पादन आपल्याकडे होत नाही ते यातून साध्य करता येईल. कमी खर्चात हे युनिट तयार करता येते. यात ड्रिप वॉटर सिस्टीमचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा व्यापक स्वरूपात वापर झाल्यास शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येतील. आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. डिसेंबरमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यात येईल. 

- डॉ. संजय ढोबळे, शास्त्रज्ञ

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानAgriculture Sectorशेती क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ