शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 19:32 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी दाखवून रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : रखडलेले काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या विकास कामाला हिरवी झेंडी दाखवून रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांनी हा निर्णय दिला. अतिक्रमण वाचविण्यासाठी कन्हान हद्दीतील महामार्गाची रुंदी कमी करण्यात आल्याचा दावा करून चंद्रभानसिंग राठोड व इतर तिघांनी जनहित याचिका दाखल केली होती. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी कन्हान हद्दीतील महामार्गाच्या जमिनीची तालुका भूमी अभिलेख निरीक्षकामार्फत एक महिन्यात मोजणी करून घ्यावी, मोजणीमध्ये अतिक्रमण आढळून आल्यास ते जिल्हाधिकारी व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मिळून १५ दिवसामध्ये हटवावे, अतिक्रमण हटविण्यापूर्वी अतिक्रमणधारकांना सुनावणीची संधी देण्यात यावी व त्यानंतर महामार्गाचे रखडलेले संपूर्ण काम नऊ महिन्यामध्ये पूर्ण करण्यात यावे असे आदेश दिलेत.हा ४४ व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. केंद्र सरकारने वाढती वाहतूक लक्षात घेता कन्हानमध्ये बायपास रोड बांधला आहे. त्यामुळे कन्हान शहरातून जाणारा महामार्ग राज्य सरकारला हस्तांतरित केला जाणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाचे विकासकाम केले जात आहे. विकासकाम पूर्ण झाल्यानंतर महामार्ग राज्य सरकारच्या स्वाधीन केला जाईल. यापूर्वी न्यायालयाने या महामार्गाची निश्चित रुंदी किती आहे अशी वारंवार विचारणा केली होती. परंतु, कुणालाच त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने महामार्गाच्या विकासकामावर स्थगिती दिली होती. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अजय घारे व अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी बाजू मांडली.निर्णयातील निरीक्षणहे २५० कोटी रुपयांचे काम आहे. काम वेळेवर पूर्ण न झाल्यास निधी परत जाईल. त्यामुळे नागरिकांना चांगल्या रोडच्या सुविधेपासून वंचित रहावे लागेल. या याचिकेमुळे रोडचे काम रखडले होते. परिणामी, या भागात अनेक गंभीर अपघात झाले. त्या कारणानेही रोडचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. हा महामार्ग प्रत्येक ठिकाणी समान रुंदीचा करण्यासाठी विविध शहरांमधील हजारो घरे तोडावी लागू शकतात. ते टाळण्यासाठी संबंधित शहरांत बायपास रोड बांधण्यात आले आहेत असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्ग