शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मेडिकलमध्ये मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. मेडिकलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) न्युओनेटल व्हेंटिलेटर बंद पडले. यावर असलेल्या पाच बालकांना श्वास घेणे कठीण झाले. याची दखल तातडीने डॉक्टरने घेतली. पाचही बालकांना ‘अम्बु बॅग’वर घेतले, यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, हा विभाग तब्बल सहा तास अंधारात होता.

ठळक मुद्देसहा तास वीज खंडित : व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ‘अम्बु बॅग’वर घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. मेडिकलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) न्युओनेटल व्हेंटिलेटर बंद पडले. यावर असलेल्या पाच बालकांना श्वास घेणे कठीण झाले. याची दखल तातडीने डॉक्टरने घेतली. पाचही बालकांना ‘अम्बु बॅग’वर घेतले, यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, हा विभाग तब्बल सहा तास अंधारात होता.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) वीज खंडित होणार नाही याच्या दक्षतेसाठी मेडिकलचा स्वत:चा विद्युत विभाग आहे तर रुग्णालयलाला वीज पुरवठा करणाºया कंपनीनेही वीज खंडित होणार नाही यासाठी विशेष सोय केली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन मोठ्या जनरेटरची सोयही आहे. परंतु शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने कुठल्या सोयी आणि कुठली दक्षता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.‘पीआयसीयू’मधील रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक वीज गेली. १० मिनिटांतच डॉक्टर व परिचारिकांची धावपळ सुरू झाली. ‘पीआयसीयू’च्या आत नातेवाईकांना जात येत नाही. यामुळे दाराबाहेर नातेवाईकांची गर्दी वाढली. याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाच्या एक-एक नातेवाईकांना आत घेतले. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेली मुले जोरजारोत श्वास घेत असल्याचे तर काहींच्या तोंडातून फेस निघत असल्याचे दिसून आले. नातेवाईकांची रडारड सुरू झाली. डॉक्टर व परिचारिकांनी तातडीने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ‘बॅग व्हॉल्व मास्क व्हेंटीलेशन’ म्हणजे ‘अम्बु बॅग’वर टाकले. रात्रभर एका हाताने रबरी जाड फुगा दाबून, कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागला. रात्री ३.३० च्या सुमारास वीज आली आणि पुन्हा खंडित झाली. नंतर वीज आली ती थेट ८ वाजतानंतरच. डॉक्टरांच्या तत्परतेने मुले वाचली, असेही नातेवाईक म्हणाले.या संदर्भात बालरोग विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. गोल्हर यांना विचारले असता, त्यांनी रात्री वीज खंडित झाल्याचे व रुग्णांना ‘अम्बु बॅग’वर हलविण्यात आल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. परंतु अधिक माहितीसाठी त्यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना विचारा असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयPower Shutdownभारनियमन