शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मेडिकलमध्ये मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. मेडिकलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) न्युओनेटल व्हेंटिलेटर बंद पडले. यावर असलेल्या पाच बालकांना श्वास घेणे कठीण झाले. याची दखल तातडीने डॉक्टरने घेतली. पाचही बालकांना ‘अम्बु बॅग’वर घेतले, यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, हा विभाग तब्बल सहा तास अंधारात होता.

ठळक मुद्देसहा तास वीज खंडित : व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ‘अम्बु बॅग’वर घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. मेडिकलच्या बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) न्युओनेटल व्हेंटिलेटर बंद पडले. यावर असलेल्या पाच बालकांना श्वास घेणे कठीण झाले. याची दखल तातडीने डॉक्टरने घेतली. पाचही बालकांना ‘अम्बु बॅग’वर घेतले, यामुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक म्हणजे, हा विभाग तब्बल सहा तास अंधारात होता.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) वीज खंडित होणार नाही याच्या दक्षतेसाठी मेडिकलचा स्वत:चा विद्युत विभाग आहे तर रुग्णालयलाला वीज पुरवठा करणाºया कंपनीनेही वीज खंडित होणार नाही यासाठी विशेष सोय केली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन मोठ्या जनरेटरची सोयही आहे. परंतु शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने कुठल्या सोयी आणि कुठली दक्षता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.‘पीआयसीयू’मधील रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक वीज गेली. १० मिनिटांतच डॉक्टर व परिचारिकांची धावपळ सुरू झाली. ‘पीआयसीयू’च्या आत नातेवाईकांना जात येत नाही. यामुळे दाराबाहेर नातेवाईकांची गर्दी वाढली. याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाच्या एक-एक नातेवाईकांना आत घेतले. त्यावेळी व्हेंटिलेटरवर असलेली मुले जोरजारोत श्वास घेत असल्याचे तर काहींच्या तोंडातून फेस निघत असल्याचे दिसून आले. नातेवाईकांची रडारड सुरू झाली. डॉक्टर व परिचारिकांनी तातडीने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ‘बॅग व्हॉल्व मास्क व्हेंटीलेशन’ म्हणजे ‘अम्बु बॅग’वर टाकले. रात्रभर एका हाताने रबरी जाड फुगा दाबून, कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागला. रात्री ३.३० च्या सुमारास वीज आली आणि पुन्हा खंडित झाली. नंतर वीज आली ती थेट ८ वाजतानंतरच. डॉक्टरांच्या तत्परतेने मुले वाचली, असेही नातेवाईक म्हणाले.या संदर्भात बालरोग विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. गोल्हर यांना विचारले असता, त्यांनी रात्री वीज खंडित झाल्याचे व रुग्णांना ‘अम्बु बॅग’वर हलविण्यात आल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. परंतु अधिक माहितीसाठी त्यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना विचारा असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयPower Shutdownभारनियमन