शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींना दिली ग्रामपंचायतीची जबाबदारी  : शिक्षकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:47 IST

खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाच्या संप मिटेपर्यंत मुख्याध्यापकांची केली नियुक्ती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षकांचे खरे कार्य अध्यापनचे आहे की शिक्षण सोडून इतर अवांतर कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, असा सवाल आता करायला लागले आहे. कारण शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामात गुंतविण्यात येत आहे. आता खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.गेल्या १५ दिवसापासून ग्रामसेवकांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासन ठप्प झाले आहे. गावगाड्याचा कारभार थांबला आहे. नालेसफाई, स्वच्छता, पाणी शुद्धता, जंतुनाशक फवारणी अशाप्रकारची दैनंदिन गरजेची कामे सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पसरला आहे. शासनाकडून ग्रामसेवकांचा संप मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उलट ग्रामसेवकांचे काम शिक्षकांकडून करून घेण्याचा प्रयत्न जि.प.प्रशासनाकडून केल्या जात असल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांची कामे पुढील आदेशापर्यंत मुख्याध्यापाकांनी करण्याबाबत पं.स.मौदा ,कळमेश्वर व भिवापूरच्या खंडविकास अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले असून त्याबाबतचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.अगोदरच अशैक्षणिक कामाच्या विळख्यात अडकलेल्या शिक्षकांच्या मागे पुन्हा एक प्रकारचे अशैक्षणिक काम लावून जि.प प्रशासन शिक्षकांना शैक्षणिक कामापासून परावृत्त करण्यात येत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षकांनी आता शैक्षणिक कार्य सोडून अशैक्षणिक कामेच करायची काय ? एकीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवायचे आणि दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्ता ढासळली म्हणून शिक्षकांच्या नावाने बोंबा मारायच्या असा संताप सुद्धा शिक्षकांनी व्यक्त केला. यापूर्वी दोन वषार्पूर्वी अंगणवाडी सेविकांच्या संपात सुद्धा अंगणवाडीतील आहार वाटपाचे काम शिक्षकांकडे देण्यात आले होते. आदेश परत घ्या, अन्यथा आंदोलनअध्यापनाचे कार्य सोडून वाट्टेल त्या कामाला लावायला शिक्षक हे कुणी वेठबिगार नाही. कुणी संपावर गेले, कुठे कर्मचारी कमी आहे त्या-त्या ठिकाणी पर्याय म्हणून शिक्षकांची सेवा घ्यायची आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा डिंडोरा पिटायचा ही प्रशासनाची भूमिका निंदनीय व संतापजनक आहे. कुणीही शिक्षक ग्रामसेवकांचे तात्पुरते कार्य करणार नाही. संबंधित खंडविकास अधिकाºयांनी निर्गमित केलेले आदेश परत घ्यावे अन्यथा याविरोधात आंदोलन उभारले जाईल.लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

टॅग्स :Teacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायत