शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

गुरुजींना दिली ग्रामपंचायतीची जबाबदारी  : शिक्षकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:47 IST

खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाच्या संप मिटेपर्यंत मुख्याध्यापकांची केली नियुक्ती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षकांचे खरे कार्य अध्यापनचे आहे की शिक्षण सोडून इतर अवांतर कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, असा सवाल आता करायला लागले आहे. कारण शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामात गुंतविण्यात येत आहे. आता खंडविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांना ग्रामपंचायत सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्तीही केली आहे.गेल्या १५ दिवसापासून ग्रामसेवकांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासन ठप्प झाले आहे. गावगाड्याचा कारभार थांबला आहे. नालेसफाई, स्वच्छता, पाणी शुद्धता, जंतुनाशक फवारणी अशाप्रकारची दैनंदिन गरजेची कामे सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पसरला आहे. शासनाकडून ग्रामसेवकांचा संप मिटविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उलट ग्रामसेवकांचे काम शिक्षकांकडून करून घेण्याचा प्रयत्न जि.प.प्रशासनाकडून केल्या जात असल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांची कामे पुढील आदेशापर्यंत मुख्याध्यापाकांनी करण्याबाबत पं.स.मौदा ,कळमेश्वर व भिवापूरच्या खंडविकास अधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले असून त्याबाबतचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.अगोदरच अशैक्षणिक कामाच्या विळख्यात अडकलेल्या शिक्षकांच्या मागे पुन्हा एक प्रकारचे अशैक्षणिक काम लावून जि.प प्रशासन शिक्षकांना शैक्षणिक कामापासून परावृत्त करण्यात येत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षकांनी आता शैक्षणिक कार्य सोडून अशैक्षणिक कामेच करायची काय ? एकीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवायचे आणि दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्ता ढासळली म्हणून शिक्षकांच्या नावाने बोंबा मारायच्या असा संताप सुद्धा शिक्षकांनी व्यक्त केला. यापूर्वी दोन वषार्पूर्वी अंगणवाडी सेविकांच्या संपात सुद्धा अंगणवाडीतील आहार वाटपाचे काम शिक्षकांकडे देण्यात आले होते. आदेश परत घ्या, अन्यथा आंदोलनअध्यापनाचे कार्य सोडून वाट्टेल त्या कामाला लावायला शिक्षक हे कुणी वेठबिगार नाही. कुणी संपावर गेले, कुठे कर्मचारी कमी आहे त्या-त्या ठिकाणी पर्याय म्हणून शिक्षकांची सेवा घ्यायची आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचा डिंडोरा पिटायचा ही प्रशासनाची भूमिका निंदनीय व संतापजनक आहे. कुणीही शिक्षक ग्रामसेवकांचे तात्पुरते कार्य करणार नाही. संबंधित खंडविकास अधिकाºयांनी निर्गमित केलेले आदेश परत घ्यावे अन्यथा याविरोधात आंदोलन उभारले जाईल.लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

टॅग्स :Teacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायत