शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:15 IST

शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानातून ७ ऑगस्टपासून या महिन्याचे धान्य वितरण करायचे होते. यासाठी प्रशासनाद्वारे ई-पॉश मशीनही सुरू करण्यात आली आहे. या बॉयोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करीत कार्ड धारकांना धान्य वितरण करण्याचे निर्देश रेशन दुकानदारांना देण्यात आले होते. याच गोष्टीमुळे दुकानदारांनी धान्य वितरण करण्यास नकार दिला. ई-पॉश मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेण्याच्या प्रक्रियेने धान्य वितरण करण्यास नागपूर रेशन दुकानदार संघाने जाहीरपणे नकार दिला. अंगठा लावण्याच्या प्रक्रियेमुळे कार्डधारक आणि दुकानदारांना कोविड १९ चे संक्रमण होण्याचा धोका संघटनेने व्यक्त केला.प्राप्त माहितीनुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या कारणाने सरकारने मार्च ते ३१ जुलै २०२० पर्यंत रेशन केंद्रावर धान्य वितरणासाठी कार्डधारकांऐवजी दुकानदारांनी अंगठे लावण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. मात्र १ ऑगस्टपासून पुन्हा कार्डधारकांचे अंगठे लावणे आवश्यक करण्यात आले. यावर दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोविड-१९ चा फैलाव वेगाने होत आहे. नागपूर शहरातही परिस्थिती विपरीत होत असून दररोज अनेक लोक संक्रमित होत आहेत. अशावेळी कार्डधारकांचे अंगठे ई-पॉश बॉयोमेट्रिक मशीनला लावून धान्य वितरण करणे घातक ठरू शकते, अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली. यामुळे कोविडचे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियमही प्रभावित होणार असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. अंगठा लावण्याची प्रक्रिया रद्द करा, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा दुकानदार संघटनेने दिला आहे.शहरात दोन दुकानदार संक्रमितरेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी सांगितले, अनेकदा ग्राहकांचा हात पकडून अंगठा लावावा लागतो. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होते. त्यामुळे कोविडचे संक्रमण पसरण्याची शक्यता असते. सरकारने दुकानदारांना कोविडसाठी विम्याचे संरक्षण दिलेले नाही. कुठलीही सुरक्षेची सुविधाही उपलब्ध नाही. अशावेळी जीव धोक्यात घालून धान्य वितरण करावे लागते. कार्डधारकांचा अंगठा घेऊन आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. दररोज कोविड-१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. शांतिनगर आणि डागा ले-आऊट येथील दोन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारने ग्राहकांचा अंगठा घेण्याऐवजी दुकानदारांचेच अंगठे लावण्याची प्रक्रिया पूर्ववत करावी, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा अग्रवाल यांनी दिला.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकारShoppingखरेदी