शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जुती किंवा सँडल्सच्या सोलमध्ये जीपीएस; आपत्तीच्या वेळी 'प्रेशर सेन्सर'द्वारे घरच्यांनाही जाईल ताबडतोब माहिती

By निशांत वानखेडे | Updated: February 24, 2025 11:24 IST

प्रा. राहुल पेठे यांचा प्रयोग : जुतीच्या सोलमध्ये जीपीएस, जीएसएम सिस्टीम

निशांत वानखेडेनागपूर : काळ बदलतोय, मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. मात्र त्यांची सुरक्षा आजही समाजाला भेडसावणारा प्रश्न आहे. यावर उपाय शोधण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयोग नागपूरच्या प्राध्यापकाने केला आहे. त्यांनी मुलींच्या जुती किंवा सँडल्सच्या सोलमध्ये जीपीएस व जीएसएम तंत्र बसविले आहे. कोणत्याही आपत्तीच्या वेळी सोलमधल्या 'प्रेशर सेन्सर'द्वारे पोलिस, अॅम्ब्युलन्स व घरच्यांनाही ताबडतोब मदतीसाठी संदेश जाईल.

एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे तंत्र विकसित केले आहे. त्यांनी जुतीच्या सोलमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम व जीएएसएम सिस्टीम फिट केले आहे. शिवाय अंगठ्याच्या खाली प्रेशर सेन्सर लावला आहे.

रात्री-बेरात्री बाहेर असताना किंवा दिवसाही कधी महिला, मुलींसोबत अनुचित घटना घडत असेल, तर प्रेशर पॉइंटद्वारे जुळलेल्या क्रमांकावर जीएसएम सिस्टीमने ताबडतोब संदेश जाईल. हा संदेश घरच्यांसोबत पोलिसांना आणि रुग्णवाहिकेलासुद्धा पोहचेल. जीपीएस सिस्टीमने मुलीचे लोकेशन पटकन कळेल आणि मदत पोहचविण्यास मदत होईल, असा दावा प्रा. पेठे यांनी केला आहे.

डॉ. पेठे यांच्या संकल्पनेतून हे तंत्र विकसित करण्यात व्यंकट रेड्डी, आर्यन सिंह, ईशा मानवटकर व विशाल टिकले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पेटंट मंजूर झाल्यावर कंपन्यांशी करार करून व्यावसायिक उपयोगासाठी तयार करण्यात येईल, असे डॉ. पेठे यांनी सांगितले.

हेल्मेटमध्ये हवेच्या पिशव्या

  • डॉ. पेठे यांच्या टीमने रस्ते सुरक्षेवरही प्रयोग केला आहे. त्यांनी सेन्सरयुक्त हेल्मेटमध्ये एअर बॅग्स बसविल्या आहेत. बाइक चालविताना अपघाताची स्थिती निर्माण झाल्यावर जोराचा धक्का बसताच हेल्मेटमधील एअर बॅग्स खुलतील.
  • या बॅग्स चेहऱ्यावर येणार नाहीत, तर दोन्ही भुजा आणि छातीच्या भागाला सुरक्षित करतील. यामुळे बाइक चालक पडला तरी त्याला अधिक मार लागणार नाही, असा दावा डॉ. पेठे यांनी केला. पेटंट मंजूर होताच ते महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करू, अशी माहिती डॉ. पेठे यांनी दिली.

समृद्धीवर अपघात टाळण्यासाठीही 'फास्टॅग'मध्येच प्रयोग

  • समृद्धी महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. हा सिमेंटचा रस्ता सरळ व पूर्णपणे पांढरा आहे. त्यावरून सूर्यकिरणांचे परावर्तन होत असून त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. चालकांना थकवा व झोप येते. यामुळे वाहनचालकांनी ठराविक अंतरावर थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी 'फास्टॅग'मध्येच अंतर मोजण्याचे तंत्र फिट करण्यात येईल.
  • हे तंत्र दर ५० किमीवर अलर्ट देईल. १५० किमी चालल्यावर वाहन थांबविणे आवश्यक असेल. चालक थांबला नाही तर त्यांच्या फास्टॅगमधूनच दंड वसूल करण्यात येईल. यासाठी महामार्गावर दर ५० किमीला रेस्ट रूम, हॉटेलची व्यवस्था आणि पोलिस यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले. याचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूर