शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गोवारी समाज संतप्त, आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 22:41 IST

Gowari community angry,nagpur news गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देगोवारी शहीद स्मारकात झाली बैठक : पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयाचा निर्णय येताच समाजातील २०० वर प्रमुख कार्यकर्ते व नेते शुक्रवारी गोवारी शहीद स्मारक येथे एकत्र आले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर चिंतन केले. यावेळी शासनाच्या विराेधातील संतापही अनेकांनी व्यक्त केला. या निर्णयाविराेधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा एकदा न्याय मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे सहसचिव व याचिकाकर्ते हेमराज नेवारे, गोवर्धन काळसर्पे, जयदीप राऊत, रुपेश चामलाटे, योगेश नेहारे, झेड. आर. दुधकवर प्रामुख्याने उपस्थित हाेते.

आता राज्य व केंद्र सरकारने ११४ शहीद गोवारींना न्याय द्यावा

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु शासनाच्या चुकीमुळेे हा निर्णय आला. राज्य शासनाबद्दल समाजात प्रचंड संताप पसरला आहे. आता राज्य व केंद्र सरकारला खरच ११४ शहीद गोवारींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य शासनाने संशाेधन करून गोवारींना अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेण्याची शिफारस करावी व केंद्राने ती मान्य करून ११४ शहीद गोवारींना न्याय द्यावा.

कैलास राऊत, अध्यक्ष गोवारी समाज संघटना

दुर्देवी निकाल, विकासाच्या वाटा बंद होणार

अनेक वर्षाच्या लढ्यानंतर २०१८ साली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले हाेते. काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकले. परंतु आजच्या निर्णय हा अतिशय दुदैवी आहे. यामुळे गोवारी समााजाच्या विकासाच्या वाटाच बंद होतील. परंतु आम्ही या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा न्याय मागू.

योगेश नेहारे, सामाजिक कार्यकर्ते

राज्य शासनाबद्दल संताप

गाेवारी शहीद स्मारक येथे पार पडलेल्या बैठकीत गोवारी समाज बांधवांनी राज्य शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. एकीकडे राज्य शासन धनाढ्य समाजाच्या प्रश्नावर न्यायालयात मोठमोठ्या वकिलांची फौज उभी करते. परंतु गरीब गोवारी समाजाकडे मात्र दुर्लक्ष करते. गोवारी समाजाला न्याय मिळू नये, अशीच राज्य शासनाची एकूण भूमिका आहे का, असा सवाल याावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूरagitationआंदोलन