शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोवारी समाज संतप्त, आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 22:41 IST

Gowari community angry,nagpur news गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देगोवारी शहीद स्मारकात झाली बैठक : पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोवारी समाजाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने गोवारी समाजात निराशा पसरली आहे तर शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयाचा निर्णय येताच समाजातील २०० वर प्रमुख कार्यकर्ते व नेते शुक्रवारी गोवारी शहीद स्मारक येथे एकत्र आले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर चिंतन केले. यावेळी शासनाच्या विराेधातील संतापही अनेकांनी व्यक्त केला. या निर्णयाविराेधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा एकदा न्याय मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे सहसचिव व याचिकाकर्ते हेमराज नेवारे, गोवर्धन काळसर्पे, जयदीप राऊत, रुपेश चामलाटे, योगेश नेहारे, झेड. आर. दुधकवर प्रामुख्याने उपस्थित हाेते.

आता राज्य व केंद्र सरकारने ११४ शहीद गोवारींना न्याय द्यावा

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु शासनाच्या चुकीमुळेे हा निर्णय आला. राज्य शासनाबद्दल समाजात प्रचंड संताप पसरला आहे. आता राज्य व केंद्र सरकारला खरच ११४ शहीद गोवारींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य शासनाने संशाेधन करून गोवारींना अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेण्याची शिफारस करावी व केंद्राने ती मान्य करून ११४ शहीद गोवारींना न्याय द्यावा.

कैलास राऊत, अध्यक्ष गोवारी समाज संघटना

दुर्देवी निकाल, विकासाच्या वाटा बंद होणार

अनेक वर्षाच्या लढ्यानंतर २०१८ साली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले हाेते. काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकले. परंतु आजच्या निर्णय हा अतिशय दुदैवी आहे. यामुळे गोवारी समााजाच्या विकासाच्या वाटाच बंद होतील. परंतु आम्ही या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा न्याय मागू.

योगेश नेहारे, सामाजिक कार्यकर्ते

राज्य शासनाबद्दल संताप

गाेवारी शहीद स्मारक येथे पार पडलेल्या बैठकीत गोवारी समाज बांधवांनी राज्य शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. एकीकडे राज्य शासन धनाढ्य समाजाच्या प्रश्नावर न्यायालयात मोठमोठ्या वकिलांची फौज उभी करते. परंतु गरीब गोवारी समाजाकडे मात्र दुर्लक्ष करते. गोवारी समाजाला न्याय मिळू नये, अशीच राज्य शासनाची एकूण भूमिका आहे का, असा सवाल याावेळी उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूरagitationआंदोलन