शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सरकारने जाणीवपूर्वक विकास निधी थांबविला, विजय वडेट्टीवार यांची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 11:59 IST

६ फेब्रुवारी रोजी केदार व वडेट्टीवार या दोघांच्याही याचिकेवर एकत्र सुनावणी

नागपूर : माजी मंत्री सुनील केदार यांच्यानंतर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून राज्य सरकारने ब्रह्मपुरीसह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी मंजूर निधी जाणीवपूर्वक थांबविला, असा गंभीर आरोप केला आहे. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी शुक्रवारी वडेट्टीवार यांची बाजू ऐकून याचिकेवरील सुनावणी ६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. ६ फेब्रुवारी रोजी केदार व वडेट्टीवार या दोघांच्याही याचिकेवर एकत्र सुनावणी केली जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ मधील अर्थसंकल्पामध्ये जलसंवर्धन, नगरविकास, ग्रामविकास, आदिवासी विकास इत्यादी विभागांतर्गतच्या विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्य सचिवांनी १८ जुलै, २०२२ रोजी वादग्रस्त आदेश जारी करून या निधीला स्थगिती दिली. परिणामी, संबंधित विभागांनीही आपापल्या स्तरावर आदेश जारी करून विकास निधी थांबविला. त्यामुळे टेंडर मागविण्यात आलेली व कार्यादेश जारी झालेली अनेक विकासकामेही रखडली आहेत, असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.

सरकारचे वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावे आणि विकासकामांचा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. केदार यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातील मंजूर विकासकामांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. वडेट्टीवार यांच्यातर्फे ॲड. निखिल कीर्तने यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारHigh Courtउच्च न्यायालय