शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:58 IST

साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसंघाबाबत अनेक गैरसमज : सर्वसमावेशक संघटना असल्याचे उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.आपल्या भाषणादरम्यान लालकृष्ण अडवाणींच्या एका पुस्तकाचा दाखला देत असताना ते बोलत होते. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो. २१ व्या वर्षी प्रचारक असताना अडवाणींना संघावर लादलेली बंदी व संघावर टीका होत असतानादेखील स्पष्टीकरण न दिले जाणे याबाबत प्रश्न पडले होते. याबाबत त्यांनी गोळवलकर गुरुजी यांनाच विचारणा केली होती. संघाचे लिखीत संविधान सरकारने मागितले तर ते त्यांना देण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्षता काय आहे हे सरकारला समजायला हवे असे उत्तर देत गोळवलकरांनी अशोकचक्राचे उदाहरण दिले होते. असे अनेक प्रश्न संघस्थानी विचारले जातात व प्रत्येकाच्या मनातील शंकांचे योग्य समाधान केले जाते. १९२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. संघावर टीका होत असते व ती होतच असेल. मात्र आतापर्यंतचा प्रवास पाहता डॉ.हेडगेवार यांनी मांडलेले तत्त्वज्ञान मजबूत होते हे दिसून येते, असे राज्यपाल म्हणाले.सोबतच संघाने व्यक्तीचे मत तसेच पूजाअर्चना, धर्माच्या अधिकारांचा नेहमीच आदर केला आहे. संघातून अनेक समाजप्रबोधन करणारे लोक घडले. याशिवाय समाजातील सर्वच समाजप्रबोधकांचा संघात सन्मान करण्यात येतो व आठवणदेखील करण्यात येते. संघ सर्वसमावेशक आहे हे सांगत राज्यपालांनी मुंबईतील मल्याळी समाजाचे उदाहरण दिले. नारायण गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला समाजातील पदाधिकाऱ्यांनी मला बोलविले. त्यांना वाटले की गुरुजींबाबत फारशी कुणाला माहिती नाही. मात्र संघात नारायण गुरुजींचे प्रात:स्मरण करण्यात येते. संघाबाबत लोकांचा असलेला असा गैरसमज दूर व्हायला हवा, असेदेखील राज्यपाल म्हणाले.शिक्षणप्रणालीत भारतीयत्वावर भर हवादेश एकेकाळी विश्वगुरू होता. आपले जुने वैभव परत मिळवायचे असेल तर भारतीयत्वावर भर असलेल्या शिक्षणप्रणालीची आवश्यकता आहे. शिक्षणप्रणालीत आधुनिकता, उद्यमशीलतेच्या भावनेलादेखील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर