शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:58 IST

साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसंघाबाबत अनेक गैरसमज : सर्वसमावेशक संघटना असल्याचे उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.आपल्या भाषणादरम्यान लालकृष्ण अडवाणींच्या एका पुस्तकाचा दाखला देत असताना ते बोलत होते. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो. २१ व्या वर्षी प्रचारक असताना अडवाणींना संघावर लादलेली बंदी व संघावर टीका होत असतानादेखील स्पष्टीकरण न दिले जाणे याबाबत प्रश्न पडले होते. याबाबत त्यांनी गोळवलकर गुरुजी यांनाच विचारणा केली होती. संघाचे लिखीत संविधान सरकारने मागितले तर ते त्यांना देण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्षता काय आहे हे सरकारला समजायला हवे असे उत्तर देत गोळवलकरांनी अशोकचक्राचे उदाहरण दिले होते. असे अनेक प्रश्न संघस्थानी विचारले जातात व प्रत्येकाच्या मनातील शंकांचे योग्य समाधान केले जाते. १९२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. संघावर टीका होत असते व ती होतच असेल. मात्र आतापर्यंतचा प्रवास पाहता डॉ.हेडगेवार यांनी मांडलेले तत्त्वज्ञान मजबूत होते हे दिसून येते, असे राज्यपाल म्हणाले.सोबतच संघाने व्यक्तीचे मत तसेच पूजाअर्चना, धर्माच्या अधिकारांचा नेहमीच आदर केला आहे. संघातून अनेक समाजप्रबोधन करणारे लोक घडले. याशिवाय समाजातील सर्वच समाजप्रबोधकांचा संघात सन्मान करण्यात येतो व आठवणदेखील करण्यात येते. संघ सर्वसमावेशक आहे हे सांगत राज्यपालांनी मुंबईतील मल्याळी समाजाचे उदाहरण दिले. नारायण गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला समाजातील पदाधिकाऱ्यांनी मला बोलविले. त्यांना वाटले की गुरुजींबाबत फारशी कुणाला माहिती नाही. मात्र संघात नारायण गुरुजींचे प्रात:स्मरण करण्यात येते. संघाबाबत लोकांचा असलेला असा गैरसमज दूर व्हायला हवा, असेदेखील राज्यपाल म्हणाले.शिक्षणप्रणालीत भारतीयत्वावर भर हवादेश एकेकाळी विश्वगुरू होता. आपले जुने वैभव परत मिळवायचे असेल तर भारतीयत्वावर भर असलेल्या शिक्षणप्रणालीची आवश्यकता आहे. शिक्षणप्रणालीत आधुनिकता, उद्यमशीलतेच्या भावनेलादेखील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर