शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शासनाने सुचविला प्राचार्याचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:47 IST

नागपूर विद्यापीठाशी संलग्नित बहुतांश महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाही. शासनाने पूर्णवेळ प्राचार्याच्या नियुक्तीवर निर्बंध लावले आहे. प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात खोळंबा निर्माण होत असल्याने शासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राचार्याच्या नियुक्तीचा पर्याय सुचविला आहे.

ठळक मुद्देमोठ्या संख्येने महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत गुणवत्ता असलेल्या प्राध्यापकाकडे सोपवा अतिरिक्त पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विद्यापीठाशी संलग्नित बहुतांश महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाही. शासनाने पूर्णवेळ प्राचार्याच्या नियुक्तीवर निर्बंध लावले आहे. प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात खोळंबा निर्माण होत असल्याने शासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राचार्याच्या नियुक्तीचा पर्याय सुचविला आहे.पूर्वी प्राचार्य निवृत्त झाल्यास वरिष्ठ प्राध्यापकाला प्राचार्याचा चार्ज दिला जायचा. परंतु वरिष्ठ प्राचार्याची व्यवस्थापनाशी जमत नसेल तर वाद निर्माण व्हायचा. व्यवस्थापनाचा वरिष्ठ प्राध्यापकाला डावलून इतर प्राध्यापकाकडे अतिरिक्त पदभार देण्याचा विचार असेल तरी, वरिष्ठ प्राध्यापकाची एनओसी घ्यावी लागत होती. व्यवस्थापनाने जर एनओसी न घेता नियुक्ती केल्यास वरिष्ठ प्राध्यापक न्यायालयात जायचे. त्यामुळे न्यायालयीन वाद वाढले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचेही नुक सान होत होते. यासंदर्भात एका शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशात नियमित प्राचार्याची रीतसर नियुक्ती होईपर्यंत प्राचार्याची अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीस प्रभारी प्राचार्य म्हणून नेमण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनाला दिले होते. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ज्या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य नाही, वरिष्ठ प्राध्यापक व व्यवस्थापनाचे वाद आहेत. अशा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी महाविद्यालयातील पीएच.डी. धारक व १५ वर्षाचा अनुभव असलेल्या प्राध्यापकाला अतिरिक्त प्राचार्याचा पदभार देता येईल, असे स्पष्ट केले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये ही अर्हता उपलब्ध नाही तेथे ज्येष्ठतम प्राध्यापकास प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा.पूर्णवेळ प्राचार्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे देयके सादर होऊ शकत नाही, प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. पण विद्यापीठ अजूनही या निर्णयाच्या बाबतीत स्पष्ट नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर