शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 18:41 IST

कोणी कितीही श्रेय घेतले तरी हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्याचे नाव महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला माहिती असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मेगा प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे श्रेय महाविकास आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. हा महामार्ग अद्याप पूर्णत्वास आलेला नसताना, महामार्गाच्या लोकार्पणाचा घाट घातला जात आहे. अशात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.    

समृद्धी महामार्गाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता श्रेयवादाची स्पर्धा प्रारंभ झाली असून कोणी कितीही श्रेय घेतले तरी हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्याचे नाव महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला माहिती असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरु झाली. फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनीही मंत्री म्हणून काम केले आहे. परंतु समृद्धी महामार्गाचे एकूणएक काम आणि व्हिजन देवेंद्र फडणवीस यांचे होते. समृद्धी महामार्ग करावा हे पहिल्यांदा त्यांनाच सुचल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMLAआमदार