शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

नारायण राणे यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाईल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 13:22 IST

काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे.

ठळक मुद्देनारायण राणे यांनी दोन आठवडयांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना कोल्हापूरमध्ये आपण लवकरच मंत्री बनू असे म्हटले होते.

नागपूर - काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे. मंगळवारी नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन केले जाईल असे स्पष्ट केले. खडसे आणि नारायण राणे दोघांचा अनुभव पक्षासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार नारायण राणे यांना भाजपाच्या कोटयातून मंत्रिपद दिले जाणार आहे असे फडणवीस म्हणाले.  भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेले नारायण राणे  राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.

नारायण राणेंचे भाजपामध्ये पुनर्वसन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी दोन आठवडयांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना कोल्हापूरमध्ये आपण लवकरच मंत्री बनू असे म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही तसेच संकेत दिल्याने राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे तसेच सध्या सरकारबाहेर असल्याने अस्वस्थ असलेल्या एकनाथ खडसे यांच्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण विधान केले.

 पुर्नवसन विस्थापितांचे होते, खडसे तर प्रस्थापित नेते आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे इतक्यात तरी खडसेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होईल असे वाटत नाही.  एकनाथ खडसे सध्या आपल्याच सरकारला घरचा आहेर देत आहेत.  खडसे यांनी सोमवारी प्रत्येक मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. चार वर्षांपासून एकच ऐकतोय, जे शक्य आहे, तेच सांगा. हे काय सरकार आहे का? अशा शब्दांत त्यांनी विविध मंत्र्यांना धारेवर धरीत सरकारचे कान टोचले. खडसे यांच्या प्रश्नांनी सरकर अडचणीत येत असल्याने विरोधकांनीही त्यांना साथ दिली.

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच एकनाथ खडसे यांचे उग्र रूप सरकारला पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हाफकीन महामंडळाशी संबंधित पहिलाच प्रश्न होता. त्यावर उपप्रश्न सादर करीत एकनाथ खडसे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शासनाच्या हलगर्जीपणामुळे संशोधन बंद पडले आहे. संशोधकांना योग्य वेतन नाही. संशोधनाला चालना मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला. खडसे यांचे उग्र रूप पाहून बापट यांनी ‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ असे उत्तर दिले. 

यानंतर तिसरा प्रश्न हा स्वत: एकनाथ खडसे यांचाच होता. त्यावर त्यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. ५१ गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न घेऊन मी स्वत: मंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्री स्वत: बोलले, तरी काम व्हायला पाच महिने लागतात. हे काय चालले आहे. हे राज्य आहे की काय? अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस